आधुनिक द्राक्ष शेतीचे तंत्रज्ञान



जीएची फवारणी शक्‍यतो सकाळच्या वेळी करावी. त्यामुळे चांगले परिणाम दिसून येतात. साधारणपणे सकाळी 9 ते 12 या वेळेत फवारणी किंवा डीपिंग करावे. नंतर तीन ते पाच वाजेपर्यंत संध्याकाळी फवारणी किंवा डीप देण्यात यावे. एप्रिल छाटणीनंतरची सूक्ष्म घडनिर्मिती व्यवस्थित झाली नसल्यास अशा बागेतील घड कमजोर दिसतात. अशा बागेमध्ये पाच पीपीएम जीएचे प्रमाण वापरावे. तसेच पुढच्या अवस्थेतसुद्धा कमी प्रमाणातच जीए द्यावे. एखादा घड स्थिरावल्यानंतर फुलोरा अवस्थेत पाकळ्यांची वाढ जास्त झाली नसल्यास 20 पीपीएम जीए द्यावा. हे करत असताना घडाच्या वाढीची अवस्था ओळखणे आवश्‍यक असते. अन्यथा, सुधारणा होण्याऐवजी विपरीत परिणाम दिसू शकतात.
मागील लेखात आपण जीएचे द्रावण तयार करण्याविषयी माहिती घेतली. आजच्या लेखात आपण जीएचा प्रभावीपणे वापर कसा करावा याविषयी माहिती घेऊ. बिनबियांच्या द्राक्षांमध्ये जीए या संजीवकाचा वापर अनिवार्य ठरतो. द्राक्षवेलीच्या ऑक्‍टोबर छाटणीनंतर वाढीच्या विविध अवस्थेत वेगवेगळे परिणाम साधण्यासाठी जीएचा प्रभावी वापर केला जातो.
1) प्राथमिक वाढीसाठी वापर ः जीएचा वापर हा पाकळ्यांमधील अंतर वाढविण्यासाठी घडाच्या प्राथमिक अवस्थेत म्हणजे "प्रीब्लूम' अवस्थेत केला जातो. जीएचा हा वापर सर्वच प्रकारच्या द्राक्ष उत्पादनांमध्ये केला जातो.
व्यवस्थापन ः
1) घडांचा रंग पोपटी हिरवा म्हणजे साधारणतः सात पानांच्या अवस्थेमध्ये किंवा घडाचा आकार साधारणतः एक इंच असताना दहा पीपीएम जीएची फवारणी करावी.
2) दुसरी फवारणी तीन ते चार दिवसांनंतर 15 पीपीएम या प्रमाणात घ्यावी.
3) फवारणीपूर्वी वांझ फुटी काढून विरळणी करून घ्यावी.
4) सर्वसाधारणपणे एकरी 400 ते 600 लिटर फवारणीचे द्रावण वापरावे.
गरज भासल्यास दुसऱ्या फवारणीनंतर किंवा डीपिंग झाल्यावर 20 पीपीएम जीएचा वापर तीन ते चार दिवसांनंतर करावा. त्यामुळे पाकळ्यांची लांबी वाढून घड मोकळा होण्यास मदत होते.
दक्षता -
1) घड पोपटी रंगांच्या अवस्थेमध्ये असताना जीएच्या द्रावणात घड ताणले गेल्यामुळे घड मोडण्याची किंवा तुटण्याची शक्‍यता असते.
2) ढगाळ हवामान असल्यास जीएची फवारणी टाळावी. हवा कोरडी असताना फवारणी घ्यावी. तसेच डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वाढत असल्याने या फवारणी अगोदर "डाऊनी'साठी प्रतिबंधक फवारणी करणे आवश्‍यक असते. या वेळी डाऊनीपासून मुक्त राहण्यासाठी जीएसोबत बुरशीनाशकांचा वापर करावा.
3) या अवस्थेत जीएचा जास्त प्रमाणात वापर टाळावा. जीएच्या जास्त वापरामुळे घडाचे व पाकळ्यांचे देठ जाड व कडक होतात. देठ शेंड्याकडे चपटे झालेले आढळून येतात. घड उन्हात असल्यास देठ लाल पडण्याची शक्‍यता असते. तसेच सावलीतील घड पूर्णपणे गळू शकतात.
4) जीएची फवारणी शक्‍यतो सकाळच्या वेळी करावी. त्यामुळे चांगले परिणाम दिसून येतात. साधारणपणे सकाळी 9 ते 12 या वेळेत फवारणी किंवा डीपिंग करावे. नंतर तीन ते पाच वाजेपर्यंत संध्याकाळी फवारणी किंवा डीप देण्यात यावे.
5) एप्रिल छाटणीनंतरची सूक्ष्म घडनिर्मिती व्यवस्थित झाली नसल्यास अशा बागेतील घड कमजोर दिसतात. अशा बागेमध्ये वरीलप्रमाणे जीएचा वापर न करता दहा पीपीएम ऐवजी पाच पीपीएम जीएचे प्रमाण वापरावे. तसेच पुढच्या अवस्थेतसुद्धा कमी प्रमाणातच जीए द्यावे.
एखादा घड स्थिरावल्यानंतर फुलोरा अवस्थेत पाकळ्यांची वाढ जास्त झाली नसल्यास 20 पीपीएम जीए द्यावा. हे करत असताना घडाच्या वाढीची अवस्था ओळखणे आवश्‍यक असते. अन्यथा, सुधारणा होण्याऐवजी विपरीत परिणाम दिसू शकतात.
मणी व फुलगळीसाठी वापर ः
अनेक वर्षांपासून जीएचा वापर विरळणी करण्यासाठी होत आहे. जीएच्या वापरामुळे घडाच्या देठाची लांबी वाढून मण्यांमधील अंतर वाढते आणि फुलगळ होऊन पुढील विरळणी करणे शक्‍य होते.
आमच्या संस्थेतील संशोधनात असे आढळून आले आहे, की जीएमुळे घडांची व पाकळ्यांची लांबी वाढते; परंतु अपेक्षेप्रमाणे मणीगळ होत नाही. कुठल्याही रसायनांमुळे अजून तरी थॉमसन सीडलेस जातीमध्ये शंभर टक्के विरळणी साध्य होत नाही. ढगाळ वातावरण असेल किंवा कार्बारिलचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास घड पूर्णपणे झडण्याचा संभव असतो. शिवाय मण्यांची संख्या कात्रीच्या साह्याने कमी करणे आवश्‍यक ठरते.
व्यवस्थापन -
1) मणीगळ करण्यासाठी 50 टक्के फुले उमलण्याच्या अवस्थेत 20 पीपीएम ते 40 पीपीएम जीएच्या द्रावणात घड बुडवणी करावी. वेलीला पाण्याचा जास्त ताण देऊ कारण पाण्याचा जास्त दिलेला ताण वेलीला अडचणीत आणू शकतो. अशा वेळी जमिनीचा प्रकार (हलकी किंवा भारी जमीन) फार महत्त्वाचा ठरतो. अशा परिस्थितीमध्ये फुलगळ व्हायला लागली की पूर्ण घड खाली होतो. हे सर्व टाळायचे असल्यास बागेला पाण्याचा ताण बसू नये. याकरिता जमिनीचा प्रकार व वाढीची व्यवस्था याचा सारासार विचार करून पाण्याचे नियोजन करावे.
दक्षता काय घ्याल?
1) पूर्ण फुलोरा ते तीन-चार मि.मी. अवस्थेच्या काळात जीएचा वापर करू नये. यामुळे विरळणी न होता "शॉर्ट बेरीज'चे प्रमाण वाढते.
2) जीएसोबत कार्बारिलची फवारणी करू नये. तसेच पाण्याचा ताण जास्त दिल्यास कार्बारिल वापरण्याचे टाळावे.
3) विरळणीसाठी ढगाळ हवामानात जीएची फवारणी घेऊ नये.
4) कॅनॉपी (विस्तार) जास्त असेल व घड सावलीत असतील तर फवारणी होऊ नये.
विरळणीच्या मात्रा पूर्ण झाल्यानंतर व मणी सेट झाल्यानंतर घडाची लांबी अधिक असेल, तर कात्रीच्या लांबीएवढे किंवा वीतभर लांबी ठेवून शेंडा खुडावा. कात्रीच्या साह्याने विरळणी करताना घडातील पहिल्या तीन पाकळ्या सारवून चौथी, सहावी, आठवी, दहावी, बारावी इ. या क्रमाने घडातील पाकळ्या, मण्यांचा आकार दोन-तीन मि.मी. व्यासाचा असताना काढाव्यात. बऱ्याच बागांमध्ये घडाच्या वरच्या बाजूचे मणी आकाराने लहान राहिल्याचे दिसून येणे. याचे प्रमुख कारण म्हणजे वरील मणी हे संजीवकांच्या द्रावणात पूर्णपणे बुडविले जात नाहीत. ते व्यवस्थित न बुडविले गेल्याने आकाराने लहान राहतात. यासाठी वरील तीन पाकळ्या काढून नंतरच्या दोन-तीन पाकळ्या ठेवून त्यानंतर अल्टरनेट पाकळ्या घडावर ठेवून बाकीच्या पाकळ्या काढून टाकाव्यात. साधारणतः 10-12 पाकळ्या प्रत्येक घडावर ठेवाव्यात व प्रत्येक पाकळीस सरासरी दहा मणी ठेवल्यास 100-120 मण्यांची मर्यादा लक्षात घेऊन थिनिंगची मर्यादा ठरवावी. अशाप्रकारे प्रत्येक घडावर 100-120 मणी राहतील व घड सुटसुटीत/ मोकळा होईल.
तक्ता क्र. 1
जीएचा निर्यातक्षम घडाच्या पाकळ्यांच्या वाढीसाठी व फुलोरा अवस्थेतील वापर
क्र.अवस्थासंजीवक व त्याचे प्रमाणद्रावणाचा सामूकार्य
1)5 पाने अवस्था किंवा पोपटी रंगाचा घडजीए 10 पीपीएम + युरिया फॉस्फेट5-6पाकळ्यांची लांबी वाढविणे
2)पहिल्या अवस्थेनंतर 3-4 दिवसांनीजीए 15 पीपीएम + सायट्रिक किंवा फॉस्फोरिक ऍसिड5-6पाकळ्यांची लांबी वाढविण्यासाठी
3)गरजेनुसार दुसऱ्या अवस्थेनंतर 3-4 दिवसांनीजीए 20 पीपीएम + सायट्रिक किंवा फॉस्फोरिक ऍसिड5-6पाकळ्यांची लांबी वाढविण्यासाठी
4)50% फुलोरा अवस्थाजीए 40 पीपीएम + सायट्रिक किंवा फॉस्फोरिक ऍसिड5-6पाकळ्यांची लांबी वाढविण्यासाठी 
अधिक वाचा

द्राक्ष घडाच्या गुणवत्तावाढीसाठी जीएचा प्रभावी वापर

बिया असणाऱ्या द्राक्षांत मण्यांच्या वाढीसाठी द्राक्ष मण्याची बी संजीवकांचा नैसर्गिक स्रोत असते; परंतु बिनबियांच्या द्राक्षामध्ये बाहेरून संजीवकांचा वापर करणे आवश्‍यक ठरते. यात प्रामुख्याने जीएचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो. स्थानिक बाजारपेठ तसेच निर्यातीसाठीच्या सर्वच द्राक्षांमध्ये ऑक्‍टोबर छाटणीनंतर जीएचा वापर केला जातो.
द्राक्ष बागेत संजीवकांचा योग्य वापर ही आवश्‍यक आणि अत्यंत महत्त्वाची बाब आहे. संजीवकांच्या वापराशिवाय निर्यातक्षम द्राक्ष निर्मिती अशक्‍य आहे. संजीवके ही पाहिजे त्या प्रमाणात आणि योग्य त्या वाढीच्या अवस्थेतच देणे फायद्याचे ठरते. असे न झाल्यास पाहिजे ते परिणाम दिसून येत नाहीत, त्यासाठी संजीवकांचे द्रावण करण्यापासून ते वापरापर्यंत प्रत्येक बाबतीत काटेकोरपणा पाळला पाहिजे; तरच आपल्याला संजीवकांचे उत्कृष्ट परिणाम द्राक्षवेलीवर दिसून येतील.
बिया असणाऱ्या द्राक्षांत मण्यांच्या वाढीसाठी द्राक्ष मण्याची बी संजीवकांचा नैसर्गिक स्रोत असते; परंतु बिनबियांच्या द्राक्षांमध्ये बाहेरून संजीवकांचा वापर करणे आवश्‍यक ठरते. यात प्रामुख्याने जीएचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो. स्थानिक बाजारपेठ तसेच निर्यातीसाठीच्या सर्वच द्राक्षांमध्ये ऑक्‍टोबर छाटणीनंतर जीएचा वापर केला जातो.
संजीवकांचे द्रावण तयार करताना विरघळणारे रसायन वापरले जाते. जीए-3चे द्रावण तयार करताना ऍसिटोनचा वापर केला जातो. त्यासाठी 50 मि.लि. ऍसिटोन प्रति ग्रॅम जीएसाठी सूत्रच झाले आहे; परंतु 25 ते 30 मि.लि. ऍसिटोनमध्ये एक ग्रॅम जीए पूर्णतः विरघळतो, त्यामुळे यापेक्षा जास्त ऍसिटोन वापरणे गरजेचे नाही. जीए या संजीवकाचे फवारणीसाठी द्रावण तयार करताना प्रथम मूळ द्रावण (स्टॉक सोल्यूशन) करता येते. सर्वप्रथम एक ग्रॅम जीए ऍसिटोन सॉलवंटमध्ये विरघळून घ्यावा. त्याचे एकत्रित पाण्यात एक लिटर मूळ द्रावण तयार करावे. अशा पद्धतीने तयार झालेले द्रावण हे 1000 (एक हजार) पीपीएम तीव्रतेचे होईल. यातून पाहिजे त्या पीपीएमचे द्रावण फवारणीसाठी तयार करता येते. जर 10 ग्रॅम जीए एक लिटर पाण्यात (वर नमूद केल्याप्रमाणे) विरघळवल्यास द्रावण हे 10,000 पीपीएम तीव्रतेचे तयार होईल. फवारणीसाठी 10 पीपीएमचे द्रावण करावयाचे असल्यास 500 लिटर पाण्यासाठी 500 मि.लि. मूळ द्रावण घ्यावे लागेल.
खाली दिलेल्या तक्‍त्याचा वापर करून फवारणीसाठीचे द्रावण तयार करता येईल. दहा हजार पीपीएमच्या मूळ द्रावणातून हवे त्या तीव्रतेचे द्रावण तयार करता येईल.
जीए-3चे द्रावण हे सर्वपरिचित आहे. जीए-3चे द्रावण जर ऍसिडिक म्हणजेच जीएच्या द्रावणाचा पीएच (सामू) 6.0 ते 6.5 एवढा असेल, तर त्याचे शोषण जास्त होते. बऱ्याच द्राक्ष बागांतील पाण्याचा सामू हा 7.5 पेक्षा जास्त असतो. अशा वेळी फवारणीच्या द्रावणाचा सामू कमी करणे आवश्‍यक असते. यासाठी सायट्रिक ऍसिड, फॉस्फोरिक ऍसिड किंवा युरिया फॉस्फेट यांचा वापर करावा. सर्वच द्राक्ष बागांत पाण्याचा सामू, विद्युत वाहकता (ईसी), तसेच पाण्यातील विद्राव्य सोडिअमचे प्रमाण सारखे नसल्यामुळे सामू कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रावणात पाहिजे त्या प्रमाणात पाच ते सहा पीएच (सामू) मिळेपर्यंत सामू कमी करणारे रसायन पाण्यात मिसळून द्रावण ढवळून पीएच पेपरच्या साह्याने सामू तपासून पाहावा. शक्‍यतोवर युरिया फॉस्फेटची सलग फवारणी टाळावी, जेणेकरून घडाचा कडकपणा टाळता येईल.
अधिक वाचा

द्राक्ष घड जिरण्याच्या समस्येवर उपाययोजना

द्राक्ष बाग स्वमुळावर असेल तर आठ दिवसांत व खुंटावर असेल तर 10 ते 12 दिवसांत फुटी निघतात. या फुटी निघाल्यानंतर फुटीला साधारणतः एका आठवड्याने तीन ते पाच पाने दिसू लागतात. अशातच काही फुटींसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड निघतात, त्यालाच घड जिरणे असे म्हणतात. काही फुटींसोबत जर घड आधीच जोमात असेल तर घड जिरणार नाही; परंतु बऱ्याच ठिकाणी घडाचा जोम पूर्णतः नसतो, त्यामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते. हे लक्षात घेऊन बागेचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
मागील लेखात आपण ऑक्‍टोबर छाटणीनंतर एकसारख्या फुटी काढण्यासाठी हायड्रोजन सायनाईडच्या वापराबद्दल तसेच द्राक्ष बागेत बोदाचे महत्त्व याबाबत माहिती मिळवली. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे ऑक्‍टोबर छाटणी हे कौशल्याचे काम आहे.ऑक्‍टोबर छाटणी ही प्रत्यक्षपणे उत्पादनाशी निगडित असते. एकसारख्या निघणाऱ्या फुटी व फुटीबरोबर दिसणाऱ्या घडांच्या संख्येवर पुढील हंगामाचे भवितव्य ठरलेले असते.
हायड्रोजन सायनामाईड लावल्यानंतर फुटी आठ ते 12 दिवसांत दिसू लागतात. द्राक्ष बाग स्वमुळावर असेल तर आठ दिवसांत व खुंटावर असेल तर 10 ते 12 दिवसांत फुटी निघतात. या फुटी निघाल्यानंतर फुटीला साधारणतः एका आठवड्याने तीन ते पाच पाने दिसू लागतात. अशातच काही फुटींसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड अथवा बाळी निघतात, त्यालाच घड जिरणे असे म्हणतात. काही फुटींसोबत जर घड आधीच जोमात असेल तर घड जिरणार नाही; परंतु बऱ्याच ठिकाणी घडाचा जोम पूर्णतः नसतो व घड जिरण्याची समस्या उद्‌भवते.
घड जिरण्याच्या समस्येचे मूळ कारण जरी एप्रिल छाटणीतील व्यवस्थापन व त्या वेळीस होणारा वातावरणातील बदल असेल तरी या समस्येस बरीच कारणे आहेत.
घड जिरण्याची कारणे ः
1) उशिरा झालेली खरड छाटणी ः खरड छाटणी उशिरा झालेल्या बागांमध्ये खरड छाटणीनंतर अन्नसाठा तयार होणाऱ्या कालावधीमध्ये सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे ऑक्‍टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या येते.
2) खरड छाटणीनंतर ढगाळ हवामान ः खरड छाटणी मुख्यतः सुप्त अवस्थेतील घडनिर्मिती घडवून आणण्याकरिता केली जाते. सूक्ष्म घडनिर्मितीची प्रक्रिया चालू असताना वातावरणातील घटक अनुकूल नसल्यास पेशी विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम घडनिर्मितीवर होतो किंवा अंशतः घडनिर्मिती होऊन प्रत्यक्षात फूट निघण्याच्या वेळी दिसून येणारा घड हा योग्य प्रकारे तयार होत नाही.
3) फुलोरा निर्मितीतील घटकांमधील बदल ः फळधारक डोळ्यांची निर्मिती तीन अवस्थांमधून होते. ऍनालाजेनची निर्मिती, फळधारक डोळ्यांची निर्मिती आणि फुलांची निर्मिती या तीन अवस्थांपैकी फुलोऱ्यांची निर्मिती ही अवस्था खूप महत्त्वाची असते. या अवस्थेच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये त्यात प्रकाश सायटोकायनिन, आरएनए (रायबोन्युक्‍लिक ऍसिड) बदल झाल्यास त्याचा परिणाम बाळी किंवा शेंडा निर्मितीमध्ये होतो.
4) सूक्ष्म घडांचे पोषण ः काडी तपासणी अहवालामध्ये अनेक वेळा पांढऱ्या घडांची नोंद असते, म्हणजेच सूक्ष्म घडनिर्मितीमधील पहिले दोन टप्पे व्यवस्थित पार पडलेले असतात; परंतु तिसऱ्या टप्प्यात खरड छाटणीनंतर 61 ते 90 दिवसांच्या कालावधीत काही कारणामुळे घडांचे पोषण योग्य प्रकारे होत नाही. त्यातच असे घड फुटीची वाढ होताना पावसाळी हवा असेल तर असे घड फुटींच्या वाढीच्या अवस्थेत जिरण्याची शक्‍यता जास्त असते. स्वच्छ हवामानात असे घड टिकून राहतात; परंतु वाढ फारशी समाधानकारक होत नाही.
5) वेलीतील अन्नसाठा ः खरड छाटणीनंतर काडी पक्वतेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव, पाने गळणे किंवा नवीन फुटींची सतत वाढ या कारणांमुळे वेलींमध्ये पुरेसा अन्नसाठा होत नाही. या अगोदर सूक्ष्म घडनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. त्यामुळे ऑक्‍टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या या परिस्थितीमध्ये यायला नको, तरी फुटींच्या वाढीसोबत घडाचा विकास होणे अडचणीचे ठरते.
6) बोद व पांढऱ्या मुळींची संख्या ः संशोधनाअंती आढळून आले, की बागांमध्ये छाटणीच्या वेळी वेलींच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेली पांढरी मुळे नसल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम घड जिरण्यात होतो. वेलींमध्ये मुळातच अन्नसाठा कमी त्यात मुळी कार्यक्षम नसल्याने तसेच पांढरी मुळे कार्यक्षम न करून घेतल्याने फूट बाहेर पडण्यासाठी आवश्‍यक जोम मुळांद्वारे मिळत नाही, त्यामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते.
7) ऑक्‍टोबर छाटणीतील चुका ः ऑक्‍टोबर छाटणी करताना झालेल्या चुकांमुळे वेलीवर कमी घड लागतात. योग्य ठिकाणी छाटणी न झाल्यामुळे घड जिरण्याची शक्‍यता कमी होते. हायड्रोजन सायनामाईडची पेस्टिंग करताना जास्त डोळ्यांना पेस्टिंग केली गेल्यामुळे जास्त डोळे फोडून निघतात. वेलीमध्ये अन्नसाठ्याचा अभाव असताना जास्त डोळे फुटल्यास फुटीचा जोम कमी राहतो. अन्नसाठ्याची विभागणी होते व घड जिरणे किंवा लहान येणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात.
ऑक्‍टोबर छाटणीनंतरच्या उपाययोजना ः
बागेच्या व्यवस्थापनात झालेल्या काही चुका तसेच काही घटकांचा ऑक्‍टोबर छाटणीशी असणारा प्रत्यक्ष संबंध याचा विचार करता या समस्येवर ऑक्‍टोबर छाटणीनंतर कशाप्रकारे मात करता येईल यासाठी काही उपाययोजना करणे आवश्‍यक असते.
1) खरड छाटणी शक्‍यतोवर उशिरा करू नये.
2) द्राक्ष काडीची घडासाठी तपासणी करावी ः ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी द्राक्ष काडीची तपासणी करून काडीवरील डोळ्यांमधील घडांची परिस्थिती समजावून घेणे आवश्‍यक आहे. सुरवातीच्या डोळ्यांमध्ये घडनिर्मिती चांगली झालेली असते तेव्हा परिस्थिती लक्षात घेऊन छाटणी केल्यास चांगली घडनिर्मिती झालेले डोळे उपयोगात येऊ शकतात.
3) ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी ताण देणे ः छाटणीअगोदर ताण दिल्यास पानांमधील अन्नसाठा द्राक्ष काडीकडे व डोळ्यांकडे वळविला जाऊन त्याचा फायदा नवीन फुटीस होईल व एकसारखी फूट निघण्यास मदत होईल.
4) योग्य छाटणी व एकसारखी फूट ः योग्य छाटणी व नियंत्रित डोळ्यांमधून एकसारखी फूट काढणे यास देखील महत्त्व आहे. काडीवरील जितके जास्त डोळे फुटून येतील तेवढा अन्नसाठ्याचा व्यय जास्त होईल. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घड जिरण्याची समस्या उद्‌भवू शकते. म्हणूनच नेमके डोळे फुटून येण्यासाठी छाटणी व पेस्टिंगद्वारे उपाययोजना करावी. हायड्रोजन सायनामाईडचे प्रमाण योग्य वापरून पेस्टिंग करताना नेमकेच डोळे फोडून काढावेत व नंतर साधारणतः एका काडीवर एक घडाची फूट व विस्ताराच्या दृष्टीने काही वांझ फुटी राखाव्यात.
घड जिरण्याची समस्या दिसत असल्यास वाढ विरोधकांचा वापर करावा. सध्या सीसीसी सारख्या वाढविरोधकास मनाई नसली तरी त्यावरील प्रयोग सुरू असल्यामुळे ते वापरणे इष्ट होणार नाही म्हणून दुसरे वाढविरोधके वापरू नयेत. वेलीच्या वाढीचा वेग हा पाणी तसेच नत्र यांच्या नियंत्रणाने कमी करावा. या वेळी वेलीच्या वाढीचा वेग मंदावणे गरजेचे असते. त्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा योग्य वापर करावा. त्यामध्ये जास्त रसायनाचा वापर टाळावा व जोपर्यंत घड व्यवस्थित होत नाही तोपर्यंत नत्र तसेच जीएचा वापर करू नये. या दरम्यान सी. विड एक्‍सट्रॅक्‍ट किंवा तत्सम रसायनांचा वापर टाळावा. घडात सुधारणा दिसू लागल्यानंतर जीएच्या फवारणीस सुरवात करावी.
5) जमिनीचे व्यवस्थापन ः पांढऱ्या मुळींची संख्या बरेच प्रमाणात घड जिरण्याच्या समस्येसाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी जमिनीचे व्यवस्थापन करायला हवे. जमिनीच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी बोद हलकेसे हलवून मोकळे करावेत. तसेच पांढऱ्या मुळीच्या वाढीस पोषक वातावरण तयार करणे आवश्‍यक असते.
या वर्षीच्या सध्या परिस्थितीमध्ये घड जिरण्याची समस्या जास्त प्रमाणात उद्‌भवणार नाही; परंतु अनियमित पावसामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवू शकते. एप्रिल छाटणी उशिरा झालेल्या द्राक्ष बागांमध्ये ही समस्या उद्‌भवू शकते. त्यामुळे त्यांना वरील काही उपाययोजना फायदेशीर ठरतील. शेवटी प्रत्येक बागेतील परिस्थिती वेगवेगळी असेल व अशाप्रकारे एकसुरी विश्‍लेषण फायद्याचे ठरणार नाही. तेव्हा समस्येचे मूळ शोधण्याकरिता बागेत केल्या जाणाऱ्या कामाची नोंद ठेवून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचा सल्ला घ्यावा.
अधिक वाचा

...असे ठेवा द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या अवस्थेतील कामे सुरू आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता, बागेत पावसाळी वातावरण नाही. त्यामुळे रोगाच्या समस्या कमी असतील. परंतु इतर काही कामे करत असताना बागेत काय काळजी घेतली पाहिजे, याबद्दलची माहिती आजच्या लेखात घेत आहोत.
खुंटावर कलम केलेल्या बागेत डोळे फुटून निघाले असतील. काही ठिकाणी डोळे उमलण्यास अडचण येत असावी. ज्या बागेत कलम केले आहे, अशा बागेत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गवत काढून बाग स्वच्छ ठेवावी. कारण पाऊस झाला असेल अशा ठिकाणी जमिनीत जास्त आर्द्रता अनुभवास येईल. याचसोबत गवत जास्त असल्यास कलम जोडाजवळ पुन्हा जास्त आर्द्रता वाढेल. कलम जोड व जमीन यामधील अंतर फार कमी असल्यामुळे डाऊनीचा त्रास जास्त वाढू शकतो. कलम जोडावर रोग आल्यास ती कलम पूर्णत: वाया जाऊ शकते. कारण कलम जोडाच्या अवतीभवती गवत असल्यामुळे फवारणी व्यवस्थित करता येत नाही.
फळछाटणी झालेली बाग :
ज्या बागेत नुकतीच फळछाटणी झाली आहे, अशा बागेत आता डोळे फुटून घड बाहेर येण्याची स्थिती असावी. पाऊस संपून जवळपास एक आठवडा झाला, त्यामुळे या वेळी घड जिरण्याची समस्या कमी असेल. वातावरणात जास्त तापमान व आर्द्रता असेल, अशावेळी फूटसुद्धा जास्त जोमात दिसेल. अशा वातावरणात कमीत कमी हायड्रोजन सायनामाईडचा वापरसुद्धा चालेल; परंतु एकसारखी फूट निघावी या दृष्टीने जाड काडी पुन्हा एकदा पेस्ट करावी किंवा पहिल्यांदा पेस्टिंग करतेवेळी जाड काडी मोडून किंवा पिळून घ्यावी. यामुळे एकसारखी फूट बाहेर येण्यास मदत होईल. या बागेत वाढीकरिता पोषक वातावरण असल्यामुळे वाढ जास्त होईल. म्हणजेच फेलफूट लवकर काढून टाकण्याची अवस्था लवकर येईल. फुटीमध्ये अन्नद्रव्य वाया जाणार नाही, याची दक्षता घेऊन वेळीच फेलफूट काढून टाकाव्यात.
रोगनियंत्रण :
फळछाटणी होऊन काही बागेत प्रीब्लूम अवस्थेत घड दिसून येतात. सध्याच्या वातावरणाचा विचार करता द्राक्ष बागेत तापमान जास्त व आर्द्रतासुद्धा जास्त असल्याचा अनुभव येतो. याच बागेत सायंकाळी व सकाळी पानावर दवबिंदू दिसून येतील. अशावेळी पानांवर डाऊनीचा पुन्हा त्रास होण्याची समस्या आढळून येईल, तेव्हा ज्या ठिकाणी कॅनॉपीची गर्दी जास्त आहे, अशा ठिकाणी तळातील पाने काढून टाकल्यास गर्दी कमी करण्यास मदत होईल. त्याचसोबत शिफारशीत फवारणी केल्यास व्यवस्थित कव्हरेज मिळेल. या बागेत शिफारशीप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी घेऊन रोगनियंत्रणात ठेवावा.
कीडनियंत्रण :
जास्त आर्द्रतेमुळे बागेत फुलकिडी प्रादुर्भाव दरवर्षीपेक्षा या वर्षी जास्त असल्याचे आढळून येते. नवीन फुटींवर अजूनही हा त्रास दिसतो. नवीन पाने काढून टाकल्यास पानांवरील फुलकिडी घडावर पोचतील, तेव्हा शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करून वेळीच या फुलकिडीवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा मण्यांवर कीड पोचल्यास समस्या उद्‌भवतील.
थिनिंग :
लवकर छाटणी झालेल्या बागेत सध्या थिनिंगची कामे सुरू आहेत. घड जर सुरवातीसच सुटा झाला असल्यास आता जास्त थिनिंग करायची गरज नसेल; परंतु थिनिंग करतेवेळी सुरवातीच्या वरच्या तीन पाकळ्या तशाच ठेवून त्यानंतर घडाच्या परिस्थितीनुसार एका आड एक किंवा एकाआड दोन पाकळ्या अशा काढून घडातील मण्यांची संख्या ठेवावी. थिनिंग झाल्यानंतर लगेच बागेत शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. यामुळे मण्याला झालेल्या इजेपासून बचाव होईल.
अधिक वाचा

संजीवकांचा वापर

द्राक्ष बागेत अनेक संजीवकाचा वापर केला जातो त्यामध्ये प्रामुख्याने इथ्रेल (इथिलीन),जिब्रेलिक अ‍ॅसिड, लिहोसीन, सिक्स बीए ,ब्रासोनो  (पोषक ) सीपीपीयु यांचा वापर करण्यात येतो.ही संजीवके वापरतांना फारच काळजी घ्यावी लागते त्यांचे प्रमाण कश्या प्रकारे घ्यावे याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे-
१) ईथ्रेल (इथिलीन): ऑक्टोबर छाटणी पूर्वी साधारणता दोन आठवडे या संजीवकाचा वापर पानगळ करण्यासाठी केला जातो.१००० ते २५०० पीपीएम तीव्रतेचे द्रावण फवारले असता छाटणी पर्यत पाने ९० % पर्यत पानगळ होते.तसेच छाटणी योग्य डोळावर करणे सोपे जाते.तसेच छाटणीनंतर डोळे लवकर फुटण्यास मदत होते.
प्रमाण - ईथ्रेल  १२५ मिली ९९ लिटर पाणी -५०० पीपीएम
              ईथ्रेल  १५० मिली ९९ लिटर पाणी -१००० पीपीएम
             ईथ्रेल  ५०० मिली ९९ लिटर पाणी -२००० पीपीएम
             ईथ्रेल  ६२५ मिली ९९ लिटर पाणी -२५०० पीपीएम
२.जिब्रेलिक अ‍ॅसिड : जिब्रेलिक अ‍ॅसिड हे जीब्रेलीन गटातील असून याच्या मुळे पेशी लांबट होतात.घडाच्या पाकळ्या, मण्यांचे  देठ आणि मणी आकार लांबट करण्यासाठी जिब्रेलिक अ‍ॅसिड उपयोग होतो.ऑक्टोबर छाटणीनंतर घड कोवळा असतांना हे संजीवक घडावर वापरावे.घड पोपटी हिरवा असतांना १० पी.पी.एम द्रावणाची फवारणी करावी.यामुळे घडाची लांबी वाढून पाकळ्या मोकळ्या होतात
जर आपणास पहिली बुडवणी (डीप) करावयाची नसल्यास पहिल्या फवारणीनंतर दर पाच दिवसांनी पुन्हा १५ ते २० पीपीएम ने फवारणी करावी. यानंतर पुन्हा पाच दिवसांनी २० पीपीएम ने फवारणी करावी.एकूण तीन फवारण्या घ्याव्यात.
जिब्रेलिक अ‍ॅसिड द्रावण तयार करण्यासाठी प्रमाण:
एक ग्रॅम जीए + ३० मिली अ‍ॅसिटोनमध्ये विरघळून घ्यावे.त्यात क्षारविरहित स्वछ पाणी मिसळुन एक लिटर द्रावण करावे. यास मुळ द्रावण (स्टॉक सोलुशन) असे म्हणतात.
वेगवेगळ्या तीव्रतेचे द्रावण तयार करण्यासाठी :-
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- ९९ लिटर पाणी - १० पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- ४९ लिटर पाणी - २० पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- ३९ लिटर पाणी - २५ पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- २४ लिटर पाणी - ४० पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- १९ लिटर पाणी - ५० पी पी एम
जिबरेलीक अ‍ॅसिड वापरण्यासाठी घडाची अवस्था आणि संजीवकाची तीव्रता याचा मेळ घालणे महत्त्वाचे असते.
३. क्लोरमॅक्कॉट (लिहोसीन):
क्लोरमॅक्कॉट,सायकोसील,सीसीसी,मेपीकॉट क्लोराईड, आणि  लोहोसीन इत्यादि नावाने हे संजीवक ओळखले जाते.हे संजीवक वाढ निरोधक म्हणून काम करते.ऐनवेळी पाऊस पडला तर कोवळी फुट जोमाने वाढते. अशा वेळी घडापुढील शेंडा लवकर वाढतो. त्यामुळे घडांचा जोम मंदावतो या वेळी शेंड्याचा जोम थांबविण्यासाठी वाढ विरोधक संजीवकाचा वापर आवश्यक असतो. पावसाप्रमाणे काही बाबीमुळे सुद्धा शेंडा वाढीस चालना मिळते अशा वेळी हे संजीवक वापरूनसंभाव्य नुकसान टाळावे. ऑक्टोबर छाटणीनंतर घड आणि घडांची फुट वाढीचा काळात फुटीचा शेंडा जोमाने वाढतो वेलीत वाढलेल्या अन्नरसात वाढ चालू असते. फुटीच्या पाचव्या सहाव्या डोळ्यातून घड बाहेर येतो खोडाकडील अन्न रसाचा ओध शेंडा वाढीकडे असल्याने घडाचे पोषण मंदावते. याचा परिणाम घडांचा दर्जा खालवण्यात होतो. शेंडा वाढ थांबवून अन्नरसाचा ओघ घडाकडे वळवल्यास घडांचा दर्जा सुधारतो आणि हेच काम संजीवके करतात
द्राक्षासाठी लिहोसीन वापरण्याची अवस्था :
ऑक्टोबर छाटणीनंतर नवीन फुटीचा ५,६ व्या डोळ्यातील.घड कोवळा असतांना म्हणजे त्यांचा रंग पिवळट
अगर पोपटी असतांना हे संजीवक वापरावे. वेलीवर सर्वच घडाची आणि फुटीची अवस्था एक सारखी नसते. लिहोसीनचा वापर करताच सर्वच शेंड्यांचा जोम मंदावतो आणि तो घडाकडे वळतो. पानांची कर्बग्रहण शक्ती वाढते.शेंड्याकडील अन्नरसाचा ओघ थांबल्यामुळे आणि नवीन पानांची कर्बग्रहणशक्ती वाढल्यामुळे असा दुहेरी अन्नरस घडांना मिळाल्यामुळे घडाचा पोत सुधारतो.सर्व घडांची अवस्था समान पातळीवर येते आणि परिणामी जीब्रालिक असिडचा वापर सुलभ रित्या करता येतो.
द्रावणाची तीव्रता :    
योग्य वेळी वापर केल्यास २५० पीपीएम तीव्रतेचे द्रावण योग्य ठरते.पाहिजे असणा-या अवस्थेपूर्वी एक दिवस अगोदर कमी तीव्रतेचे म्हणजे पीपीएम द्रावण आणि दोन दिवस आगोदर १२५ पीपीएम चे द्रावण वापरावे.या उलट उशीर झाला तर ३७५ किंवा ४५० पीपीएम तीव्रता वापरावी. परंतु ५०० पीपीएम पेक्षा जास्त तीव्रतेचे संजीवक वापरने नुकसानीचे ठरते.सध्या बाजारात लिहोसीन हे संजीवक उपलब्ध आहे.त्याची तीव्रता ५०% असून ते द्रवरूपात उपलब्ध होते.ते पाण्यात मिसळते.
१०० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -१००० पीपीएम 
५० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -५०० पीपीएम
२५ मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -२५० पीपीएम
२० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -१२५ पीपीएम
४० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -२०० पीपीएम
६० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी- ३०० पीपीएम
७५ मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -३७५ पीपीएम
९० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -४५०पीपीएम
लिहोसीन  वापरतांना घ्यावयाची काळजी :
हे संजीवक वापरतांना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.संजीवक फवारतांना शेड्याकडील भागावर एकसारखी फवारणी करावी.फुटीवर ६ ते ७ पाने असतांना तसेच घडापुढे ५-६ पाने असतांना हे संजीवक अधिक परिणामकारक ठरते.
४) सिक्स -बी ए :
   हे संजीवक कायनेटिक या गटात मोडते.पेशीचे विभाजन करण्याच्या गुणधर्मामुळे द्राक्ष भरदार होतात. पानात अधिककर्ब ग्रहण होते.त्यामुळे फळाचे वजन आणि गोडी वाढण्यास मदत होते.फलधारणा पूर्ण झाल्यावर लगेच हे संजीवक १० ते १५ या तीव्रतेने पीपीएम फवारावे.जीब्रालिकच्या फवारण्या झाल्यानंतर गडलिंग करण्यास उशीर होत असल्यास हे संजीवक वापरावे.  
सिक्स बीए च्या जास्तीत जास्त दोन फवारण्या आणि एकूण २० पीपीएम पेक्षा कमी प्रमाणात वापर करावा.सिक्स बीए संजीवक आयसोप्रोपाईल अल्कोहोल मध्ये विरघळून घ्यावे.
५.एनएए: नॅपथेलिक अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड : य़ा संजीवकाचा द्राक्षात वापर काही विशिष्ट कारणासाठी केला जातो.मोहरगळ अथवा लहान फळ गळ थांबवण्यासाठी या संजीवकाचा उपयोग होतो.घड फुलो-यातून बाहेर पडल्यापासून तर मणी ज्वारीच्या आकाराचे होईपर्यंतच्या काळात होणारी गळ थांबवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.यासाठी सुरुवातीस २० पीपीएम तिव्रतेचे द्रावण वापरावे.फलधारनेनंतर एनएए संजीवक वापरले असता फळावरील लव (नॅचरल ब्लूम ) चांगली येते.काढणीपूर्वी मणीगळ कमी होते.तसेच एक आठवडा काढणी लांबवता येते.द्राक्ष काढणीपूर्वी कोणतेही संजीवक २५ दिवस आगोदर वापरू नये.
अधिक वाचा

द्राक्ष गुणवत्तेची त्रिसूत्री :

१.जीब्रेलिक अ‍ॅसिडचा वापर
२. विरळणी
३.गडलिंग
दर्जेदार द्राक्ष म्हणजे एक सारखे लांब असलेले व उत्तम स्वाद रंग व गोडी असलेले मणी,घडामध्ये शक्यतो शॉर्ट बेरीजचे प्रमाण असू नये.मणी एकसारख्या लांबी व फुगवणीचे असावे.दर्जेदार द्राक्ष बनविण्यासाठी अप्रत्यक्षपणे परीणाम करणारे घटक उदा.द्राक्षाची जात,हवामान ,जमिनीचा प्रकार ,मशागत पद्धती ,पाणी देणे पध्दत,रोग व किडींचा बंदोबस्त प्रत्यक्षपणे परिणाम करणारे घटक उदा.घड संख्या कमी करणे,विरळणी करणे ,गडलिंग करणे व संजीवकांचा योग्य वापर करणे हि आहेत.
१.जीब्रेलिक अ‍ॅसिडचा वापर:
१) पहिली बुडवणी (प्रीब्लूम  बुडवणी ) :घड सोनेरी हिरवा पिवळा असतांना म्हणजेच पोपटी असतांना २० ते २५  पीपीएमच्या जीएच्या द्रावणात घडाची बुडवणी करावी.साधारणपणे  थॉमसन सीडलेस २० ते २३  व्या दिवशी स्टेज येते.घडाची पहिली पाकळी मोकळी होणे म्हणजे घडाच्या दांडयापासून अलग झालेली असते.व त्या खालील पाकळ्या कॅप्सुल गोळी आकारात असतात. अशा वेळी वर नमूद केलेल्या स्टेजला बुडवणी करावी.स्टेज आलेली असेल परंतु शेंडा वाढ झालेली नसल्यास किंवा मिळालेला असल्यास घड बुडविणे अवघड होते. व अशा वेळी घडाची व फांद्यांची मोडतोड जास्त प्रमाणात होते. शेंदावाढ मिळालेली नसल्यास घड व फुटीचा शेंडा जिएच्या द्रावणात बुडवून घ्यावा. म्हणजे शेंडा वाढ व घड वाढ होण्यास मदत होईल.ही बुडवणी केल्याने घडाच्या पाकळ्या ३-४-५ दिवसांनी संपूर्ण मोकळ्या होतात व दोन पाकळ्यातील अंतरात लांबी मिळते. प्लेमसीडलेस द्राक्षामध्ये सुरुवातीला स्टेजला घड गोळी सारखा दिसत असलातरी जीए वापरल्यानंतर तो आकाराने मोठा होऊन एक चांगल्या प्रकारचा घड तयार होतो. पहिली बुडवणी झाल्यानंतर पुन्हा ४-५ दिवसांनी १० ते १५ पीपीएम जीएची फवारणी किंवा बुडवणी करावी. बुडवणी करीत असताना घडाला १/२ ते १/३ शेंडा नखलावा म्हणजे घड वीरळणी होऊन पाकळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते. तसेच दोन पाकळ्यातील व पाकळ्यातील कांड्याची लांबी मिळण्यास मदत होते.घडांचा दांडा नखलल्यास जीएमध्ये १ ग्रॅम बेनोमील किंवा १/२ मिली अ‍ॅमिस्टार प्रती लिटर पाण्यातसाठी मिसळावे म्हणजे जखमेमधून रोगराईचा प्रादुर्भाव होणार नाही.जीए फवारणी केली तरी चालेल परंतु फुटीची दाटी असता कामा नये .जीए बरोबर २ ग्रॅम युरिया प्रती लिटर पाण्यासाठी वापरावा  फवारणी एकसारखी व सर्वत्र करावी.
२.दुसरी बुडवणी (कॅपफॉल बुडवणी नंतर  ) :घडाच्या टोप्या उचलल्या नंतर किंवा गळाल्या नंतर  म्हणजेच मणी सेटिंग नंतर सीपीपीयु  बरोबर ४० पीपीएम जीए ची बुडवणी करावी.ही अवस्था साधारणता ४० ते ४५ व्या दिवशी येते.तापमाननुसार व जमिनीच्या प्रकारानुसार हि अवस्था थोडी उशीरा येऊ शकते
३.तिसरी बुडवणी - मणी ज्वारीच्या आकारा एवढे झाल्यानंतर तिसरी बुडवणी ३० ते ४० पीपीएमने करावी. भुरी नियंत्रणासाठी अ‍ॅमिस्टार १/२ मिली प्रतिलीटर ही अवस्था ५५ ते ६० दिवसांत येते.
२.विरळणी (थीनिंग )  : म्हणजे वेलीच्या क्षमतेनुसार,दर्जेदार उत्पादन मिळण्यासाठी काड्या, पाने, घड, पाकळ्या,मणी याची परिस्थीतीनुसार संख्या कमी करणे .विरळणीमुळे मण्यांची फुगवण ,पोषण ,आकर्षकता आणि वजन सुधारते.घडातील मनीकुज कमी होते. व रोग किडीचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होते.सर्व घड एकसारख्या आकाराचे तयार होण्यास मदत होते.निर्यात योग्य उत्पादन घ्यावयाचे असल्यास सर्वांत जास्त महत्व विरळणीलाच आहे.
३.गडलिंग: गडलिंगची अवस्था दुसरी बुडवणी झाल्यानंतर ३/४ दिवसांनी येते.गडलिंग करण्याची स्टेज साधारणपणे छाटणीनंतर ५० ते ६० दिवसांच्या दरम्यान येते. गडलिंग करण्याअगोदर सर्व मांडव -वेली हेलकावून घ्याव्यात.म्हणजेविरळणी होऊन शॉर्टबेरीज होणार नाही. गडलिंग साधारणपणे २ ते २.५ मि.मी.
रुंद आकाराची करावी.म्हणजेच एक रुपया नाणे जाडीची करावी. गडलिंगची जखम २१ ते २८ दिवसात भरून आली पाहिजे.गडलिंगमुळे मुळाकडे जाणारा अन्नसाठा वेलीवरील ऑक्झीन व जीब्रेलिक सारख्या संजीवकाची पातळी वाढते.
               मणी व घड मोठे करण्यासाठी  गडलिंगची  मणी  हे बाजरीच्या आकाराचे असतांना परंतु नैसर्गिक गळ झाल्यानंतर करावी.म्हणजे शॉर्टब्रेरीज होणार नाही.गडलिंग केल्यानंतर वेलीला पाण्याचा ताण पडणार नाही या कडे लक्ष द्यावे.
अधिक वाचा
.........................................................