कृत्रिम ढगांची निर्मिती आणि पाऊस

साध्या मीठाचा वापर करून ढगांचं बीजारोपण करण्याची एक सोपी आणि स्वस्त पद्धत आहे. जैविक पदार्थांच्या शेकोटीद्वारे उच्च तापमान निर्माण करायचं आणि या आगीच्या ज्वाळांवर मीठ किंवा मीठाचं पाणी शिंपडून हे साध्य करता येतं. उच्च तपमानाच्या ज्वाळा निर्माण करण्यासाठी साधं एका ठिकाणी स्थिर असलेल्या किंवा हलवता येण्यासारख्या मुशीत जैविक पदार्थ जाळले जातात. यासाठी उत्तम प्रकारची जाळण्याची सुविधा असलेलं नैसर्गिक यंत्र वापरता येतं. त्यामध्ये ज्याद्वारे ही आग फुलवता येईल अशा फुंकणी किंवा ब्लोअर असणेही आवश्यक आहे. यासाठी इलेक्ट्रिक ब्लोअर उपयुक्त ठरतो. या सर्व गोष्टी कोणत्याही खेडेगावात सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. इलेक्ट्रिकल ब्लोअर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या छोट्या मशिनरीच्या दुकानात मिळू शकतो. गावात वीजेची सुविधा नसल्यास लोहार किंवा सोनाराकडे असलेला साधा ब्लोअरसुद्धा वापरता येऊ शकेल. याची कार्यक्षमता कमी असली तरीही तो उपयुक्त आहे. जाळण्यासाठी मुस आणि ब्लोअर नसल्यास मोकळ्या जागेवर शेकोटी पेटवून त्यावर मीठ किंवा मीठाचं पाणी शिंपडून या तंत्राचा अवलंब करता येऊ शकतो.
याचा शोध कसा लागला?
महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील सुजलेगावमध्ये काही ठिकाणी डॉ. राजा मराठे यांनी 2010 मध्ये वरूणयंत्राचे प्रयोग केले. (जमिनीवर शेकोटी पेटवून त्याद्वारे आभाळातील पाणी म्हणजे पाऊस पाडण्याचे प्रयोग)
अधिक माहितीसाठी
 http://www.marathi.varunyantra.org/ या संकेतस्थळावर भेट द्या.
अधिक वाचा

द्राक्ष निर्यातीसाठी नवीन बाजारपेठांचा शोध हवा


द्राक्ष उत्पादन व निर्यातीत वृद्धी होण्यासाठी राज्यातील नाशिक, सांगली, पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर इ. जिल्ह्यांना कृषी निर्यात क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ समन्वय संस्था म्हणून काम पाहते. कृषी निर्यात क्षेत्रांतर्गत अत्याधुनिक सुविधांचा वापर करून निर्यातदार आणि द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीला गती दिली पाहिजे. 
भारतातील सन 2010-11 मधील फळ उत्पादन 74.88 दशलक्ष टन होते, तर जागतिक फळ उत्पादन 599.30 दशलक्ष टन इतके होते. फळ उत्पादनामध्ये चीन प्रथम स्थानावर असून त्यांचे फळ उत्पादन 122.18 दशलक्ष टन आहे. त्या खालोखाल भारताचे उत्पादन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्याला परकीय चलन मिळवून देण्याच्या दृष्टीने फळपिकांना चांगलेच महत्त्व आहे. द्राक्ष उत्पादनाचा विचार करता जागतिक द्राक्ष उत्पादन सन 2010-11 मध्ये 67.32 दशलक्ष टन होते. यामध्ये चीन (8.65 दशलक्ष टन) प्रथम स्थानावर, त्या खालोखाल इटली, अमेरिका, स्पेन, फ्रान्स, तुर्की, चिली, अर्जेंटिना व त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारताचे सन 2009-10 मध्ये द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र सुमारे 111 हजार हेक्‍टर होते. त्यापासून सुमारे 1.24 दशलक्ष टन इतके उत्पादन मिळाले होते. भारताच्या फळबागेखालील एकूण क्षेत्रापैकी द्राक्षाचा वाटा 1.74 टक्के असून, एकूण फळ उत्पादनातील वाटा 1.65 टक्के इतका आहे. भारत देश एकूण फळांच्या उत्पादनात जगात दुसऱ्या स्थानावर असला, तरी द्राक्ष उत्पादनात मात्र नवव्या स्थानावर आहे. 

द्राक्ष क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता - 
भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मिझोराम ही प्रमुख द्राक्ष उत्पादक राज्ये आहेत. यात महाराष्ट्राचे सन 2010-11 मधील द्राक्ष उत्पादन सर्वाधिक म्हणजे 0.77 दशलक्ष टन इतके होते. सन 2008-09 मध्ये भारताचे द्राक्ष उत्पादन 18,78,300 टन इतके उत्पादन झाले होते. त्या वेळेस महाराष्ट्रातून सुमारे 14,15,000 टन इतके, म्हणजे भारताच्या एकूण द्राक्ष उत्पादनाच्या 74.33 टक्के उत्पादन झाले होते. मात्र सन 2009-10 या कालावधीत द्राक्ष उत्पादनात कमी उत्पादकतेमुळे घट झालेली दिसली. या कालावधीत भारताच्या एकूण द्राक्ष उत्पादनाच्या 49.96 टक्के, तर सन 2010-11 मध्ये 62.68 टक्के उत्पादन राज्यात झाले. उत्पादकतेचा विचार करता उत्पादकता सन 2008-09 च्या तुलनेत कमी झालेली आहे. 

द्राक्ष - राज्यनिहाय क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता - 
भारताची राज्यनिहाय द्राक्ष फळपिकाखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता तक्ता 1 मध्ये दिली आहे. 
सन 2010-11 मध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल कर्नाटकाचे द्राक्ष उत्पादन 3,30,300 टन त्या खालोखाल तमिळनाडूचे 53,000 टन, आंध्र प्रदेशचे 27,600 टन, तर मिझोरामचे 20,400 टन इतके होते. भारतातील द्राक्षाचा क्षेत्र व उत्पादनात, महाराष्ट्राचा प्रमुख वाटा आहे. महाराष्ट्राची द्राक्षे भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहेत. द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र व उत्पादनात, देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असला तरी उत्पादकतेत मात्र मागे आहे. 
उत्पादन खर्च - 
द्राक्ष उत्पादनामध्ये साधारणपणे नाशिक, सांगली, पुणे, सोलापूर हे जिल्हे आघाडीवर आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादन खर्चाचा अभ्यास केला असता साधारणपणे प्रति हेक्‍टरी रुपये 4,65,000 पर्यंत सरासरी खर्च येत असल्याचे निदर्शनास आले. प्रति क्विंटल उत्पादन खर्चाचा विचार करता रुपये 2,500 इतका सरासरी खर्च येत असल्याचे आढळले. 

एकूण उत्पादन खर्चामध्ये खजुरावरील मजुरी, पीक संरक्षण, सेंद्रिय व रासायनिक खते इत्यादी बाबींवरील खर्च जास्त असल्याचे आढळले. 

राज्यातील द्राक्ष विक्रीचा आढावा - 

सन 2011 मधील राज्यातील प्रमुख बाजारपेठांचा अभ्यास केला असता असे निदर्शनास येते, की द्राक्षास मुंबई व नागपूर बाजारपेठेत डिसेंबर महिन्यात सर्वाधिक किंमत मिळाली तर पुणे व नाशिक बाजारपेठेत एप्रिल महिन्यात सर्वाधिक किंमत मिळाल्याचे दिसून आले. राज्यातील महत्त्वाच्या चारही बाजारपेठांचा विचार करता सर्वाधिक किंमत ही मुंबई बाजारपेठेत (7,652 रुपये प्रति क्विंटल) मिळाली. सर्वांत कमी किंमत ही नागपूर बाजारपेठेत (3,573 रुपये प्रति क्विंटल) मिळाली. राज्याचा विचार करता मुंबई ही द्राक्ष विक्रीच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्र राज्याबाहेरच्या बाजारपेठांचा विचार करता चेन्नई, दिल्ली व कोलकता या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. सन 2011 मध्ये मे महिन्यात सर्वाधिक किंमत (8,584 रुपये प्रति क्विंटल) कोलकता बाजारपेठेत मिळाली. त्या खालोखाल दिल्ली बाजारपेठेत (8,213 रुपये प्रति क्विंटल) आणि चेन्नई बाजारपेठेत (6,223 रुपये प्रति क्विंटल) मिळाली. 

द्राक्ष निर्यातीतील संधी - 
देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षविक्रीस चांगला वाव आहे. भारतीय द्राक्षाची निर्यात प्रामुख्याने नेदरलॅंड, बांगलादेश, इंग्लंड, युनायटेड अरब, रशिया, सौदी अरेबिया, बेल्जियम, थायलंड, स्वीडन, नॉर्वे इत्यादी देशात जास्त प्रमाणात होत आहे. 

निर्यातीच्या अभ्यासावरून असे निदर्शनास येते, की भारतातील द्राक्षांची सर्वाधिक निर्यात ही बांगलादेशात होत आहे; मात्र सर्वाधिक उत्पन्न नेदरलॅंडमधूनच मिळत असल्याचे दिसून येते. त्या खालोखाल इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, रशिया, सौदी अरेबिया, बेल्जियम इ. देशात निर्यात होत आहे. सन 2009-10 च्या तुलनेत सन 2010-11 मधील निर्यातीत घट झालेली आहे. सन 2009-10 मध्ये एकूण निर्यात 1,17,337.50 मे.टन इतकी होती, त्यापासून रु. 43,106.50 लाख इतके उत्पन्न मिळाले होते. मात्र सन 2010-11 मध्ये त्यात घट होऊन 93,609.30 मे.टन इतकी निर्यात झाली. त्यापासून रु. 37,395.40 इतके उत्पन्न मिळाले. 

निर्यातीतील अडचणी - 
* द्राक्ष उत्पादकांना निर्यातीमधील नुकसानीस शासकीय अनुदानाची तरतूद नाही. 
* वाहतूक कालावधीमध्ये मुंबई ते लंडन विमा संरक्षणाची सोय नाही, त्यामुळे नुकसानीची भीती असते. 
* निर्यातीसाठी आवश्‍यक द्राक्ष मण्यांचा 18 मि.मी. आकार प्राप्त करण्यास काही वेळा अडचणी येतात. 
* द्राक्ष निर्यातीसाठी आवश्‍यक शीतगृहांचा वापर फक्त तीन महिने होतो, त्याशिवाय सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे जनरेटरसाठी डिझेलचा खर्च जादा येतो. 
* आयात केलेल्या वेष्टण साहित्याचा वापर करण्याची सक्ती आहे, त्यामुळे परकीय साहित्यावर अवलंबित्व वाढले. 
* अमेरिकन जहाज वाहतूक कंपन्यांकडून जादा सागरी वाहतूक भाड्याची आकारणी होत असल्याने मिळणाऱ्या लाभाच्या प्रमाणात घट होते. 
* देशांतर्गत खराब रस्त्यामुळे द्राक्ष मणी गळणे व तडे जाण्याच्या अडचणी निर्माण झाल्याने योग्य भाव मिळत नाही. 
* द्राक्ष निर्यातीचा परवाना बिगर द्राक्ष उत्पादकांना दिला जात असल्यामुळे चांगल्या प्रतीच्या व रसायनांच्या अवशेषाचे कमी प्रमाणात असणाऱ्या द्राक्षांची निर्यात होत नाही. 
* द्राक्ष निर्यातीस आवश्‍यक युरोगॅप नोंदणीविषयक पद्धत किचकट असल्यामुळे अनेक शेतकरी प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहत आहेत. 

द्राक्ष निर्यात वृद्धीसाठी उपाययोजना - 
* निर्यातीसाठी नवीन बाजारपेठांचा शोध घेऊन तेथील किमती, ग्राहकांच्या आवडी, मागणीचा कालावधी आणि प्रत याबाबत माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी.
* निर्यातक्षम योग्य आकाराच्या द्राक्ष उत्पादनासाठी नवीन वाणांची उपलब्धता करून द्यावी. 
* चांगल्या द्राक्षांच्या निर्मितीसाठी निर्यात परवाना फक्त द्राक्ष उत्पादक आणि द्राक्ष संघांना देण्यात यावा. 
* रसायनांच्या अवशेषांचा परिणाम टाळण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, निर्यातीस प्रतिबंध असलेल्या कीडनाशकांच्या उत्पादनावर शासनाने बंदी घालावी. 
* रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जैविक कीडनाशक व रोगनाशक उपाययोजनांविषयी जनजागृती करावी. 
*"अपेडा'ने वेळोवेळी निर्यातीसंदर्भातील बदलत्या निकषांची माहिती उत्पादकांपर्यंत पोचवावी. तसेच उत्पादकांनी "अपेडा'च्या संपर्कात राहावे. 

संपर्क - 02426-243236 
( लेखक कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत) 

1) राज्यनिहाय द्राक्ष फळपिकाखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता (सन 2010-11) 
राज्यक्षेत्र (000 'हे.)उत्पादन (000 'टन)उत्पादकता (टन/ हे.) 
महाराष्ट्र86.00774.009.00 
कर्नाटक18.10330.3018.30 
तमिळनाडू2.7053.0019.30 
आंध्र प्रदेश1.3027.6021.00 
मिझोराम1.6020.4012.90 
इतर1.7029.5017.30 
भारत111.401234.9011.10 
संदर्भ - भारतीय फलोत्पादन सांख्यिकी, 2011 

 2) द्राक्ष पिकाचा सरासरी उत्पादन खर्च (रु./ क्विंटल) 
अ. क्र.खर्चाच्या बाबीखर्च 
1)खर्च "अ'2,82,000.00 
2)खर्च "ब'4,43,000.00 
3)खर्च "क'4,65,000.00 
4)प्रति क्विंटल2,500.00 

 3) भारतीय द्राक्षाची देशनिहाय निर्यात व मूल्य 
अ. क्र.देश2009-102010-11 
निर्यात (टन)निर्यात मूल्य (रु. लाख)निर्यात (टन)निर्यात मूल्य (रु. लाख) 
1)नेदरलॅंड28,821.9016,755.5017,681.5011,798.10 
2)बांगलादेश44,419.205,213.4038,052.005,142.10 
3)इंग्लंड14,308.508,165.707,550.404,743.80 
4)युनायटेड अरब10,053.604,189.109,545.904,511.10 
5)रशिया745.80598.202,368.801,838.10 
6)सौदी अरेबिया3,656.001,537.903,484.301,421.30 
7)बेल्जियम2,859.601,756.901,677.701,373.30 
8)थायलंड875.60741.201451.501335.50 
9)स्वीडन276.70145.20932.30620.90 
10)नॉर्वे799.20600.70665.40564.20 
11)इतर1,052.503,402.8010,199.704,047.10 
एकूण1,17,337.5043,106.5093,609.3037,395.40 
संदर्भ - राष्ट्रीय फलोत्पादन सांख्यिकी अहवाल, 2011
अधिक वाचा

सातबारा उतारा घेण्यासाठी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (महा. लॅण्ड रेव्हेन्यू कोड) अन्वये प्रत्येक गावातील जमिनीची कागदपत्रे ही त्या गावातील तलाठी कार्यालयात असतात, नोंदी असतात. जमीन महसूल कायद्यान्वये जमिनीच्या तलाठी दप्तरामध्ये अनेक प्रकारच्या नोंदवह्या असतात.
गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.सातबारा उतारा घेण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे किंवा अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणेकडे जाण्याची गरज भासू नये, यासाठी या उताऱ्यांचे संगणकीकरण करून ते ऑनलाइन सातबारा उतारे संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत. याशिवाय पुणे, मुंबई यासारख्या महानगरांमधील काही प्रॉपर्टी कार्ड चेही संगणकीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

सातबारा नमुना मिळवण्‍यासाठी खालील संकेतस्‍थळावर क्‍लिक करा व दिलेल्‍या सूचनांप्रमाणे जिल्‍हा, तालुका व गाव निवडा. त्‍यानंतर हवा तो गट नं. टाकल्‍यावर आपल्‍याला ७/१२ मिळेल.
http://mahabhulekh.maharashtra.gov.in/
**** जमिन मोजणी क्षेत्रफळ रुपांतरे ****
 १ हेक्टर = १०००० चौ. मी .
 १ एकर = ४० गुंठे
 १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ. फुट
 १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
 १ आर = १ गुंठा
 १ हेक्टर = १०० आर १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
 १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येतात  नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते.जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात.
अधिक वाचा

गाव नमुना म्हणजे काय

'गाव नमुना म्हणजे काय व तो कसा मिळवावा?' या प्रश्नाच्या अनुषंगाने खालील माहिती आपणास पुरवीत आहोत-
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (महा. लॅण्ड रेव्हेन्यू कोड) अन्वये प्रत्येक गावातील जमिनीची कागदपत्रे ही त्या गावातील तलाठी कार्यालयात असतात, नोंदी असतात. जमीन महसूल कायद्यान्वये जमिनीच्या तलाठी दप्तरामध्ये अनेक प्रकारच्या नोंदवह्या असतात. तलाठी दप्तर नमुना नंबर 1 ते 21 गाव नमुन्यांमध्ये असते. या नोंदवहीस वेगवेगळा अर्थ असतो.
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थानासाठीची नोंद पाहता येते.
* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.
अधिक वाचा

द्राक्षे स्वस्तात मस्त

परदेशी बाजारपेठेने देशी द्राक्षांना रासायनिक धक्का दिल्याने अनुभवातून शहाण्या झालेल्या बागायतदारांनी यंदा निर्यातीची द्राक्षे अधिक सकस आणि चवदार करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्नपूर्वक औषधांच्या मात्रा प्रमाणात दिल्याने यंदा पुन्हा चव आली आहे. उत्पादनात ३0 ते ४0 टक्के वाढ झाली ती वेगळीच. त्याचाच परिणाम म्हणून भारतीयांच्या जिभेवर यंदा स्वस्तात मस्त द्राक्षेही रेंगाळणार आहेत.
अलीकडेच नाशिक, पुणे, सांगली, सातारा व मराठवाड्यातली द्राक्षे बाजारात येऊ लागली असून, ४0 ते १00 रुपये किलोचा दर आहे. दोन वर्षांपूर्वी युरोपात निर्यात केलेल्या द्राक्षांमध्ये क्लोरमेक्वॉट क्लोराईडचा अंश आढळल्याने तेथील द्राक्षे माघारी पाठविण्यात आली होती. देशी उत्पादकांना २५0 कोटींचा फटकाही बसला होता. त्यामुळे निर्यातीसाठी कोणती द्राक्षे असावी, याकरिता जाणकारांनी नवे तंत्र विकसित केले आहे. कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाने बागायतदारांना याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे.
नाशिक ग्रेप्स बनला ब्रँड!
महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीनंतर नाशिकच्या द्राक्षांना तेथील भौगोलिक स्थितीमुळे विशिष्ट रंग व चव असते, असा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे ‘नाशिक ग्रेप्स’ हा ब्रँड बनला आहे. त्यामुळेच यंदा जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीसाठी १५ हजार ४९९ बागांची कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाकडे नोंद झाली आहे.
निर्यातही वाढणार!
द्राक्ष निर्यातीसाठी राज्यातून १७ हजार ८८५ द्राक्ष बागायदारांनी १४ हजार हेक्टर क्षेत्राची राज्य सरकारच्या कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाकडे निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.
गेल्या वर्षी १२ हजार हेक्टर क्षेत्राची निर्यातक्षम द्राक्षांसाठी नोंदणी झाली होती. साधारण एका हेक्टरवर सरासरी २३ मेट्रिक टन द्राक्षाचे उत्पादन अपेक्षित असते.


अधिक वाचा

द्राक्ष बागेची खरड छाटणीनंतर हायड्रोजन सायनामाईड

एप्रिल छाटणीनंतर द्राक्षबागेत एकसारख्या व जोमदार फुटी निघण्यासाठी द्राक्ष बागेची खरड छाटणी एक डोळा राखून करणे आवश्‍यक आहे,द्राक्षबागायतदार बऱ्याच वेळा दोन डोळे राखून छाटणी घेतात. यामुळे वरचा बारीक डोळा लवकर फुटतो व जुना महत्त्वाचा आणि जाड असा खालचा डोळा सुप्तावस्थेत राहतो. एक डोळा राखूनच छाटणी केल्यास खालचा डोळा दोन दिवस उशीर फुटेल, परंतु एकसारखी व जोमदार फूट निघण्यास मदत होईल. खरड छाटणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हायड्रोजन सायनामाईडची पेस्टिंग करावी. अनेक द्राक्षबागायतदार या वेळी हायड्रोजन सायनामाईड वापरत नाहीत. तरीसुद्धा बागेत फुटी निघतात. परंतु वातावरणात तापमान जास्त व आर्द्रता कमी असल्याकारणाने बाग मागेपुढे व उशिरा फुटते. तेव्हा हायड्रोजन सायनामाईड कमी प्रमाणात असले तरी (25 ते 30 मि.लि. प्रति लिटर) चालेल, परंतु पेस्टिंग अथवा फवारणी केल्यास बाग लवकर फुटण्यास मदत होईल,हायड्रोजन सायनामाईड २०० लिटर पाण्यासाठी एक लिटर + ७०० ग्रम १३.०.४५ + २५ मिली उच्च प्रतीचे स्टीकर मिसळून दुस-या किंवा तीस-या दिवशी ओलांद्यावर फवारणी करावी. करावी. यामुळे ओलांडा डागाळणार नाही. ज्या वेळी तापमान 40 ते 42 अंश से. असते, त्या वेळी बाष्पीभवन जास्त होते. अशा परिस्थितीत प्रति द्राक्ष वेलीस 20 लिटर पाणी द्यावे. घड निर्मितीच्या कालावधीत (खरड छाटणीनंतर 40 ते 60 दिवस) वेलीला पाण्याची गरज कमी (किमान दहा लिटर प्रति वेल) असते. तेव्हा या कालावधीत वेलीच्या वाढीचा विचार करून पाणी व्यवस्थापन करावे. काडीच्या परिपक्वतेकडे लक्ष द्यावे. त्यासाठी पालाशची उपलब्धता व शेंडा पिंचिंग करावे.
अधिक वाचा

द्राक्षांची प्रतवारी महत्वाची

द्राक्षाचे निर्यातीसाठी वर्गीकरण:
निर्यातक्षम द्राक्ष पाठवितांना द्राक्षबागायतदार किंवा निर्यातदार एकच लिहीताना दिसून येतात.सर्वजण त्यांची द्राक्ष एक्स्ट्रा क्लास (सर्वोतम) दर्जाची आहेत.अशी नोंद करतात. द्राक्षाच्या प्रतीनुसार वर्गीकरण करतांना तीन भाग पडतात प्रत्येक वर्गाची विस्तृत माहिती खालील प्रमाणे आहे.
विशिष्ट वर्ग (द्राक्षाचा सर्वोत्तम दर्जा)
आकार,वाढ,रंग या दृष्टीने घड हे त्याच्या जातीच्या गुणधर्माशी तंतोतंत असतात.त्यात कोणताही दोष नसतो.मणी घट्ट असावेत , घडशी पक्के बांधलेले व एकसारखे सुटसुटीत असावेत.
आकारमानाच्या दृष्टीने घडाचे वजन ३०० ग्रम असावे, प्रत विसंगतीमध्ये घडाच्या वजनाच्या पाच टक्क्यांपर्यत फरक ग्राह धरण्यात येतो.
वर्ग १ (द्राक्षाचा चांगला दर्जा )
मणी घट्ट व घडाशी मजबूत पकड असलेले असावेत.एकसारखे परंतु विशिष्ट वर्गाप्रमाणे सुटसुटीत असावेत.तसेच पुढील काही गुणधर्मामुळे थोडे दोष असू शकतात. आकारात किंचित कमी जास्त पणा असणे, तसेच रंगात थोडा दोष असणे, थोड्या प्रमाणात फक्त सालीवर उन्हाचे चट्टे असणे.तसेच घडाच्या वजनात दहा टक्यापर्यत विसंगती ग्राह्य धरण्यात येते.
वर्ग २ 
या वर्गाचे द्राक्ष खूप चांगल्या दर्जाची नसली तरी किमान आवश्यक गुणवतेस पात्र ठरतात.घडाचा आकार ,वाढ व रंग या मध्ये काही दोष असले तरी संबधीत गुणधर्माशी विसंगत नसतात. मण्यांची बांधणी गरजे प्रमाणे योग्य असते व ब-यापैकी सुटसुटीत असतात.घडामध्ये आकारातील दोष, रंगामध्ये दोष, थोड्या प्रमाणात सालीवर उन्हाचे चट्टे ,मन्यांवर थोडी इजा इ .दोष दिसून येतात.वर्ग-१ प्रमाणेच या वर्गात सुध्दा घडाच्या वजनात दहा टक्क्यां पर्यत विसंगती ग्राह्य धरण्यात येते. 
अधिक वाचा

द्राक्ष निर्यातीसाठी गुणवत्ता महत्वाची

द्राक्ष  हे भारतातील प्रमुख निर्यातक्षम पीक आहे .असे असले तरीही भारतातून फक्त दीड ते दोन टक्के एवढीच द्राक्ष प्रदेशात पाठवली जातात.द्राक्ष कमी निर्यात होण्याची कारणे अनेक आहेत.अभ्यासाअंती असे आढळून आलेली प्रमुख कारणे म्हणजे उच्च दर्जाची निर्यातक्षम गुणवता असलेली द्राक्षे कमी तयार होणे,जागतिकीकरणाने आणि मुक्त व्यापार पद्धतीमुळे निर्माण झालेल्या स्पर्धांमुळे आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध न होणे,ही महत्वाची कारणे लक्षात घ्यावीत.
द्राक्षासाठी गुणवता,दर्जा:
  अधिक टिकाऊपणा,देखणे रूप व पाचकता या गोष्टी खाण्याची द्राक्ष निर्यात करण्यासाठी आवश्यक आहेत्त.थॉमसन सीडलेस या जाती करीता इंग्लडमध्ये निर्यात करण्यासाठी गुणवत्ता निकष ठरलेले आहेत.हेच निकष युरोपातील इतर देशांसाठी सुध्दा सारखेच आहेत.परंतु  इंग्लडमध्ये १७ ते १९ अंश ब्रिक्स असलेल्या हिरवट पोपटी रंगांच्या द्राक्षांना अधिक मागणी असते.तर इतर बाजार पेठेत (लोकल) मात्र पिवळसर सोनेरी  रंगाची १८ ते २१ अंश ब्रिक्स असलेल्या गोड द्राक्षांना चांगली मागणी असते.
किमान आवश्यकता :
 सर्व प्रकारच्या श्रेणीमध्ये घड व मण्यांच्या आवश्यकता:

  • गुणवता :खाण्याच्यादृतीने दर्जेदार द्राक्ष असावीत.
  • स्वच्छता: इतर पदार्थापासून किंवा धुळीचे कण यापासून मुक्ती असावीत.
  • कीड,रोगमुक्त व त्यांच्या इजापासून मुक्त असावीत.
  • बाह्य दुर्गंधीयुक्त किंवा खराब नसावी. 

 मण्यांच्या बाबतीत एकसंघता असावी,सुयोग्यवाढ असावी, सामान्य फुगवण असावी (१७ ते १९ एम एम ),उन्हाचे चट्टे नसावेत,घड काळजीपूर्वक तोडलेला असावा.घडाची वाढ पूर्ण असावी.मणी पक्व्व झालेले असावेत.घडाची आवस्था अशी असावी.की त्यामुळे घड हताळनी व वाहतुकीमध्ये चांगले राहावेत. ते ग्राहाकापर्यंत व्यवस्थित पोहचले पाहिजेत. 

गुणवत्ता दर्जा मिळवण्यासाठी उपाय :
 निर्यातक्षम द्राक्षाची जी गुणवत्ता ठरवण्यात आलेली आहे.ती गुणवत्ता मिळवण्यासाठी काही मशागतीची कामे तसेच योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.त्यात  एकसूत्रता नाही म्हणून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात वाढ करण्यासाठी अजूनसुद्धा भरपूर वाव आहे.
द्राक्षाच्या प्रतीसाठी जाती परत्वे घडाचा आकार ,घडाची भरण / घडातील मण्यांची रचना, मण्यांचा व्यास,मण्यांच्या रंगातील व आकारातील एकसारखेपणा, मण्यावर लव असणे किंवा नसणे ,मन्यांवरील डाग किंवा त्यावरील उन्हाचे चट्टे या सर्व बाबी उपयोगी ठरतात.
  त्याचप्रमाणे रासायनिक पदार्थांमध्ये एकूण विद्राव्य घटक ( TTS ) आम्लता ,तसेच कीटकनाशकांचे अंश या सुध्दा मह्त्वाच्या ठरतात.तसेच मण्यांचा टिकाऊपणा ,माण्यांतील गर ,देठाची जाडी व घडाचा देठ, मण्यांच्या देठासोबत असलेली पकड या गोष्टीसुध्दा साठवणुकीसाठी महत्वाच्या आहेत,म्हणूनच गुणवता ,दर्जा यावरही अवलंबून असतो.           
अधिक वाचा

सभासद व्हा


सभासद व्हा !
संपूर्ण नाव : *
संपूर्ण पत्ता : *
दूरध्वनी: *
ई-मेल : *
सभासद : *
 - मला सभासद व्हायचे आहे.  
तुमचा फोटो :
योग्य आकाराचा फोटो असावा.
आपला अभिप्राय:
Image Verification
captcha
Please enter the text from the image:
[Refresh Image] [What's This?]
 



अधिक वाचा

या वर्षी सर्वाधिक गुणवतेची द्राक्ष

द्राक्ष निर्यात नोंदणीत दोन हजार हेक्‍टरने वाढ मागील दोन वर्षे "फयान' वादळ व अवकाळी पावसाशी सामना केलेल्या द्राक्ष उत्पादकांना यंदा मात्र वातावरणाने साथ दिली आहे. या परिस्थितीत वेलीवरील द्राक्षघडास चांगली गुणवत्ता दिसत असताना निर्यातीसाठी उत्साह वाढला आहे. गतवर्षी राज्यभरातून 15 हजार बागांमधून 12 हजार हेक्‍टर द्राक्ष क्षेत्राची नोंदणी झाली होती. यंदा त्यात तब्बल दोन हजार हेक्‍टरने वाढ झाली आहे. नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद या विभागातून कृषी विभागाने दिलेल्या मुदतीअखेर 17 हजार बागांमधून 14 हजार हेक्‍टर क्षेत्राची निर्यातीसाठी नोंदणी करण्यात आली आहे. 
नाशिकला सर्वाधिक वाढ
राज्यातील द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांपैकी सर्वाधिक 55 हजार हेक्‍टर क्षेत्र नाशिक जिल्ह्यात आहे. गतवर्षी नाशिकला 10 हजार 666 बागांची निर्यात नोंदणी झाली होती, ती यंदा 15 हजार 499 बागांची झाली आहे, तर द्राक्ष क्षेत्रात एका वर्षात 7500 वरून दहा हजार हेक्‍टरवर नोंदणी यंदा झाली आहे. बागांच्या संख्येत पाच हजाराने व क्षेत्र संख्येत अडीच हजार हेक्‍टरने वाढ झाली आहे. नोंदणीत वाढ झाली असली, तरी देशाबाहेरील बाजारपेठेत मागणी कशी राहील यावर द्राक्ष निर्यातीचे भवितव्य अवलंबून आहे.
कमी पाऊस ठरला इष्टापत्ती
कृषी अधिकारी गोविंद हांडे म्हणाले, ""ऑक्‍टोबर छाटणीनंतर विशेषतः फुलोऱ्याच्या काळात प्रतिकूल वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका आतापर्यंत बसला आहे. यंदाही पाण्याची टंचाई सर्व विभागांत आहे. मात्र, सुरवातीच्या टप्प्यात पोषक वातावरण लाभल्याने राज्यातील सर्वच द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांत चांगला बहर आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कमी खर्चात गुणवत्ता साधली असल्यामुळे निर्यातीसाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सर्वच भागांत भरपूर उत्पादन असल्याची माहिती येत आहे. बाजाराचे चित्र येत्या पंधरवड्यात स्पष्ट होणार असले तरी द्राक्ष उत्पादकांनी गुणवत्ता व रोख व्यवहार या गोष्टीवर भर देणे आवश्‍यक आहे.''
"बंपर' उत्पादनाची स्थिती नाही
द्राक्ष शिवारातील परिस्थिती चांगली असून, द्राक्ष उत्पादकांनी आगाप ऑगस्टपासून ते उशिरात उशिरा नोव्हेंबरअखेरपर्यंत छाटण्या घेतल्या आहेत, त्यामुळे टप्प्याटप्प्यानेच बाजारात माल येणार आहे, त्यामुळे एकदम बाजारात माल वाढून बाजारावर दाब येईल अशी स्थिती नाही. वातावरणाने साथ दिल्याने, तसेच बागेत चांगले व्यवस्थापन केल्यामुळे बहुतांश द्राक्ष उत्पादकांनी गुणवत्तेचा माल बनविला आहे, त्यामुळे या काळात दरात फार उतरण होण्याची शक्‍यता दिसत नाही.
पक्वतेनंतरच खुडणी करा
द्राक्षमालाची गोड चव, चांगला गर व पुरेशा पक्वतेनंतर उतरलेली फळांतील साखर या निकषांवर उतरलेल्या द्राक्षांना बाजारात मोठी मागणी राहतेच, त्यामुळे बाजारात चांगले दर असले तरी माल पक्वतेपूर्वी खुडण्याची घाई द्राक्ष उत्पादकांनी करू नये. अशा अपक्व व आंबट चवीच्या हिरवट मालामुळे ग्राहकांकडून द्राक्षाला मागणी होत नाही व त्याचा फटका चांगल्या गुणवत्तेच्या मालाला बसतो, ही काळजी शेतकऱ्यांनी घेणे आवश्‍यक राहणार आहे.
व्यवहार रोखच हवा!
सुरवातीच्या टप्प्यात बाजार तेजीवर असताना प्रामुख्याने कोलकता येथे माल पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादकांची फसवणूक केल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. सुरवातीची काही वर्षे पॅकिंग मजूर म्हणून काम करणारेच पुढे व्यापाराचा अभ्यास करून दलाल बनतात. पुढे शेतकऱ्यांचा माल गोळा करून अचानक पैसे न देता पलायन करतात, असे अनेक प्रकार समोर आले आहेत. याबाबतीत द्राक्ष उत्पादकांनी सुरवातीपासूनच सावधगिरी बाळगणे आवश्‍यक असल्याचे श्री. हांडे यांनी सांगितले.
अधिक वाचा

- देवभूमी चाखणार नाशिकची द्राक्षे

- बागायतदार संघाचा पुढाकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गतवर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून या द्राक्षांची देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाने पुढाकार घेतला आहे. खासकरून देवभूमी अर्थात केरळमध्ये नाशिकच्या द्राक्षांची विक्री करण्याचा संघाचा विचार आहे. विशेष म्हणजे, रेल्वेची वॅगन उपलब्ध होणार असल्याने देवभूमीत राहणा-यांना यंदा नाशिकची द्राक्षं चाखायला मिळणार आहेत. 
अनुकूल हवामान, पाण्याची उपलब्धता आणि रोगांचे अत्यल्प प्रमाण यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्षाचे उत्पादन जवळपास पन्नास टक्क्याहून अधिक होण्याची शक्यता आहे. यंदाच्या द्राक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गुणवत्ता असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाने म्हटले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांची तुलना करता यंदाच्या द्राक्षांची गुणवत्ता अधिक उजवी असल्याचे मत संघाचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. या द्राक्षांची टिकवण क्षमताही चांगली राहणार असल्याने त्यांच्या विक्रीत अडचण येणार नाही, असाही विश्वास द्राक्ष बागायतदार बाळगून आहेत. 
.................. 
नाशिकच्या द्राक्षांना केरळमध्ये चांगली मागणी असते. त्यामुळे तेथे द्राक्षांचे मार्केट स्थापन करण्याचा द्राक्ष बागायतदार संघाचा विचार आहे. रेल्वे वॅगनच्या उपलब्धतेचाही फायदा होणार आहे. येत्या चार ते पाच दिवसांत होणाऱ्या संघाच्या बैठकीत त्याबाबत विचार केला जाणार आहे. 

- विजय गडाख, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ
संदर्भ -म.टा.२९ डिसेंबर२०११
अधिक वाचा

थंडीचा द्राक्ष बागेवर होणारा परिणाम

सध्याच्या परिस्थितीमध्ये थंडीचा द्राक्ष बागेच्या वाढीवर परिणाम होताना दिसतो आहे. द्राक्ष बागेमध्ये सध्या वेगवेगळ्या परिस्थिती आढळून येतात. उशिरा छाटणी केलेल्या बागेत सध्या नऊ ते दहा मि.मी. आकाराचे मणी असतील, तर वेळेवर किंवा लवकर छाटलेल्या बागेत मण्यांमध्ये पाणी उतरायला सुरवात झाली असेल. अशा या परिस्थितीमध्ये थंडीचा घडांच्या वाढीवर कसा परिणाम होतो या संदर्भातील माहिती आजच्या लेखात घेत आहोत.
- डॉ. आर. जी. सोमकुंवर
सध्याच्या परिस्थितीमध्ये अति थंडी आपण अनुभवतो आहे. या वेळी प्रत्येक बागेत घडाचा विकास होण्याची अवस्था मात्र आढळून येईल. घडाचा विकास होण्याकरिता वेलीमध्ये शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग तेवढाच संतुलित असणे गरजेचे होते. त्या सोबत संजीवकांचा वापर केल्यामुळे मण्यातील प्रत्येक अवयवांमध्ये वाढ होण्याची शक्ती निर्माण होते. बागेत ही प्रक्रिया चालू राहण्याकरिता ठराविक तापमान महत्त्वाचे असते. तेव्हाच इतर गोष्टींचा फायदा होतो.
सध्याच्या परिस्थिमध्ये ज्या बागेत मण्यात पाणी उतरायला आठ ते दहा दिवस आहेत, अशा बागेत आता लवकरच मण्याचा आकार वाढवणे गरजेचे होते. परंतु किमान तापमान हे फारच कमी झाल्यामुळे वेलीमध्ये क्रिया मंदावल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणजे मण्याचा आकार वाढणे थांबले असे आपण म्हणतो. पाणी उतरल्यानंतर जवळपास तीन मि.मी. आकार वाढतो. तेव्हा पाणी उतरेपर्यंत बऱ्यापैकी आकार वाढवून घेणे गरजेचे होते. हा आकार वाढविण्यासाठी आपण पुन्हा संजीवकाचे डीप घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा चांगला परिणाम मिळावा म्हणून त्यामध्ये स्टिकरसुद्धा मिसळले जाते; परंतु सध्या जर थंडी आहे तर विकास होणार नाही. म्हणजेच आपण ज्या उपाययोजना केल्या त्याचा फायदा झाला नाही किंवा होणार नाही. उलट मण्यावर स्टिकरमुळे पांढरे डाग दिसायला लागतात. हे डाग पुसून जाण्याकरिता आपण पुन्हा कोणती फवारणी करावी याबद्दल चौकशी करतो. आता संजीवकांचीसुद्धा विशिष्ट मर्यादा ठरवल्यामुळे निर्यात करणाऱ्या द्राक्षाकरिता या गोष्टींचा विचार करणे गरजेचे झाले आहे.
घडावर गाठी येणे आणि देठ सुकणे -
घडावर गाठी येणे तसेच देठ सुकून मणी सुकण्याची समस्या या वर्षी बऱ्याच बागांमध्ये दिसून आली आहे. ज्या बागेत ही परिस्थिती आढळून येते, अशा बागेत बारकाईने निरीक्षणे केल्यास घडाच्या पुढील काडीवर प्रत्येक डोळ्यांवर फुगीर भाग म्हणजेच गाठीप्रमाणे चित्र दिसते. अशा ठिकाणी पेरासुद्धा लहान दिसतो. काही ठिकाणी जुनी काडी सुद्धा अशीच दिसते. याच काडीवर आलेला घड सुद्धा अशाच प्रकारचा आहे. घडाच्या दांड्यावर गाठ दिसते, ही गाठ पोकळ असते. मण्यात पाणी उतरत असताना त्या गाठीवर चीर पडते आणि तो घड निकामी होतो. त्यामुळे नक्कीच या परिस्थितीमध्ये वेलीवर एकतर कुठल्या तरी गोष्टींचा ताण बसला असावा किंवा काही गोष्टींचा अतिरेक झाला असावा किंवा या वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला असल्याने त्याचा परिणाम म्हणून ही परिस्थिती उद्‌भवली असावी. सध्या जरी यावर उपाय दिसत नसला तरी ही परिस्थिती टाळण्याकरिता खरड छाटणीच्या वेळी मात्र विशेष काळजी घेणे महत्त्वाचे राहील.
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे येथे कार्यरत आहेत.)
सध्याच्या परिस्थितीमधील उपाययोजना -
सध्याच्या थंडीच्या कालावधीत बागेतील तापमान कसे वाढवता येईल याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. बागेत मशागत करून मोकळे पाणी देणे, शेडनेटचा वापर करणे, पेपरने घड झाकून घेणे, इत्यादी गोष्टी आपल्याला तातडीने करता येतील. या सोप्या उपाययोजना केल्यास त्याचा फायदा घडाच्या विकासाकरिता नक्कीच होऊ शकेल. बागेत सकाळी शेकोटी पेटवून तापमान वाढवता येईल, परंतु प्रत्येक ठिकाणी हे शक्‍य होईल असे नाही. बोदावर आच्छादन करून घ्यावे. यामुळे मुळांतील तापमान चार ते पाच अंश से.ने वाढते. अशा परिस्थितीमध्ये मुळी सुद्धा काम करायला लागते आणि थोडेफार तरी अन्नद्रव्य वर उचलले जाऊन घडाचा विकास होण्यास मदत होईल.
अधिक वाचा

आधुनिक द्राक्ष शेतीचे तंत्रज्ञान



जीएची फवारणी शक्‍यतो सकाळच्या वेळी करावी. त्यामुळे चांगले परिणाम दिसून येतात. साधारणपणे सकाळी 9 ते 12 या वेळेत फवारणी किंवा डीपिंग करावे. नंतर तीन ते पाच वाजेपर्यंत संध्याकाळी फवारणी किंवा डीप देण्यात यावे. एप्रिल छाटणीनंतरची सूक्ष्म घडनिर्मिती व्यवस्थित झाली नसल्यास अशा बागेतील घड कमजोर दिसतात. अशा बागेमध्ये पाच पीपीएम जीएचे प्रमाण वापरावे. तसेच पुढच्या अवस्थेतसुद्धा कमी प्रमाणातच जीए द्यावे. एखादा घड स्थिरावल्यानंतर फुलोरा अवस्थेत पाकळ्यांची वाढ जास्त झाली नसल्यास 20 पीपीएम जीए द्यावा. हे करत असताना घडाच्या वाढीची अवस्था ओळखणे आवश्‍यक असते. अन्यथा, सुधारणा होण्याऐवजी विपरीत परिणाम दिसू शकतात.
मागील लेखात आपण जीएचे द्रावण तयार करण्याविषयी माहिती घेतली. आजच्या लेखात आपण जीएचा प्रभावीपणे वापर कसा करावा याविषयी माहिती घेऊ. बिनबियांच्या द्राक्षांमध्ये जीए या संजीवकाचा वापर अनिवार्य ठरतो. द्राक्षवेलीच्या ऑक्‍टोबर छाटणीनंतर वाढीच्या विविध अवस्थेत वेगवेगळे परिणाम साधण्यासाठी जीएचा प्रभावी वापर केला जातो.
1) प्राथमिक वाढीसाठी वापर ः जीएचा वापर हा पाकळ्यांमधील अंतर वाढविण्यासाठी घडाच्या प्राथमिक अवस्थेत म्हणजे "प्रीब्लूम' अवस्थेत केला जातो. जीएचा हा वापर सर्वच प्रकारच्या द्राक्ष उत्पादनांमध्ये केला जातो.
व्यवस्थापन ः
1) घडांचा रंग पोपटी हिरवा म्हणजे साधारणतः सात पानांच्या अवस्थेमध्ये किंवा घडाचा आकार साधारणतः एक इंच असताना दहा पीपीएम जीएची फवारणी करावी.
2) दुसरी फवारणी तीन ते चार दिवसांनंतर 15 पीपीएम या प्रमाणात घ्यावी.
3) फवारणीपूर्वी वांझ फुटी काढून विरळणी करून घ्यावी.
4) सर्वसाधारणपणे एकरी 400 ते 600 लिटर फवारणीचे द्रावण वापरावे.
गरज भासल्यास दुसऱ्या फवारणीनंतर किंवा डीपिंग झाल्यावर 20 पीपीएम जीएचा वापर तीन ते चार दिवसांनंतर करावा. त्यामुळे पाकळ्यांची लांबी वाढून घड मोकळा होण्यास मदत होते.
दक्षता -
1) घड पोपटी रंगांच्या अवस्थेमध्ये असताना जीएच्या द्रावणात घड ताणले गेल्यामुळे घड मोडण्याची किंवा तुटण्याची शक्‍यता असते.
2) ढगाळ हवामान असल्यास जीएची फवारणी टाळावी. हवा कोरडी असताना फवारणी घ्यावी. तसेच डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वाढत असल्याने या फवारणी अगोदर "डाऊनी'साठी प्रतिबंधक फवारणी करणे आवश्‍यक असते. या वेळी डाऊनीपासून मुक्त राहण्यासाठी जीएसोबत बुरशीनाशकांचा वापर करावा.
3) या अवस्थेत जीएचा जास्त प्रमाणात वापर टाळावा. जीएच्या जास्त वापरामुळे घडाचे व पाकळ्यांचे देठ जाड व कडक होतात. देठ शेंड्याकडे चपटे झालेले आढळून येतात. घड उन्हात असल्यास देठ लाल पडण्याची शक्‍यता असते. तसेच सावलीतील घड पूर्णपणे गळू शकतात.
4) जीएची फवारणी शक्‍यतो सकाळच्या वेळी करावी. त्यामुळे चांगले परिणाम दिसून येतात. साधारणपणे सकाळी 9 ते 12 या वेळेत फवारणी किंवा डीपिंग करावे. नंतर तीन ते पाच वाजेपर्यंत संध्याकाळी फवारणी किंवा डीप देण्यात यावे.
5) एप्रिल छाटणीनंतरची सूक्ष्म घडनिर्मिती व्यवस्थित झाली नसल्यास अशा बागेतील घड कमजोर दिसतात. अशा बागेमध्ये वरीलप्रमाणे जीएचा वापर न करता दहा पीपीएम ऐवजी पाच पीपीएम जीएचे प्रमाण वापरावे. तसेच पुढच्या अवस्थेतसुद्धा कमी प्रमाणातच जीए द्यावे.
एखादा घड स्थिरावल्यानंतर फुलोरा अवस्थेत पाकळ्यांची वाढ जास्त झाली नसल्यास 20 पीपीएम जीए द्यावा. हे करत असताना घडाच्या वाढीची अवस्था ओळखणे आवश्‍यक असते. अन्यथा, सुधारणा होण्याऐवजी विपरीत परिणाम दिसू शकतात.
मणी व फुलगळीसाठी वापर ः
अनेक वर्षांपासून जीएचा वापर विरळणी करण्यासाठी होत आहे. जीएच्या वापरामुळे घडाच्या देठाची लांबी वाढून मण्यांमधील अंतर वाढते आणि फुलगळ होऊन पुढील विरळणी करणे शक्‍य होते.
आमच्या संस्थेतील संशोधनात असे आढळून आले आहे, की जीएमुळे घडांची व पाकळ्यांची लांबी वाढते; परंतु अपेक्षेप्रमाणे मणीगळ होत नाही. कुठल्याही रसायनांमुळे अजून तरी थॉमसन सीडलेस जातीमध्ये शंभर टक्के विरळणी साध्य होत नाही. ढगाळ वातावरण असेल किंवा कार्बारिलचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास घड पूर्णपणे झडण्याचा संभव असतो. शिवाय मण्यांची संख्या कात्रीच्या साह्याने कमी करणे आवश्‍यक ठरते.
व्यवस्थापन -
1) मणीगळ करण्यासाठी 50 टक्के फुले उमलण्याच्या अवस्थेत 20 पीपीएम ते 40 पीपीएम जीएच्या द्रावणात घड बुडवणी करावी. वेलीला पाण्याचा जास्त ताण देऊ कारण पाण्याचा जास्त दिलेला ताण वेलीला अडचणीत आणू शकतो. अशा वेळी जमिनीचा प्रकार (हलकी किंवा भारी जमीन) फार महत्त्वाचा ठरतो. अशा परिस्थितीमध्ये फुलगळ व्हायला लागली की पूर्ण घड खाली होतो. हे सर्व टाळायचे असल्यास बागेला पाण्याचा ताण बसू नये. याकरिता जमिनीचा प्रकार व वाढीची व्यवस्था याचा सारासार विचार करून पाण्याचे नियोजन करावे.
दक्षता काय घ्याल?
1) पूर्ण फुलोरा ते तीन-चार मि.मी. अवस्थेच्या काळात जीएचा वापर करू नये. यामुळे विरळणी न होता "शॉर्ट बेरीज'चे प्रमाण वाढते.
2) जीएसोबत कार्बारिलची फवारणी करू नये. तसेच पाण्याचा ताण जास्त दिल्यास कार्बारिल वापरण्याचे टाळावे.
3) विरळणीसाठी ढगाळ हवामानात जीएची फवारणी घेऊ नये.
4) कॅनॉपी (विस्तार) जास्त असेल व घड सावलीत असतील तर फवारणी होऊ नये.
विरळणीच्या मात्रा पूर्ण झाल्यानंतर व मणी सेट झाल्यानंतर घडाची लांबी अधिक असेल, तर कात्रीच्या लांबीएवढे किंवा वीतभर लांबी ठेवून शेंडा खुडावा. कात्रीच्या साह्याने विरळणी करताना घडातील पहिल्या तीन पाकळ्या सारवून चौथी, सहावी, आठवी, दहावी, बारावी इ. या क्रमाने घडातील पाकळ्या, मण्यांचा आकार दोन-तीन मि.मी. व्यासाचा असताना काढाव्यात. बऱ्याच बागांमध्ये घडाच्या वरच्या बाजूचे मणी आकाराने लहान राहिल्याचे दिसून येणे. याचे प्रमुख कारण म्हणजे वरील मणी हे संजीवकांच्या द्रावणात पूर्णपणे बुडविले जात नाहीत. ते व्यवस्थित न बुडविले गेल्याने आकाराने लहान राहतात. यासाठी वरील तीन पाकळ्या काढून नंतरच्या दोन-तीन पाकळ्या ठेवून त्यानंतर अल्टरनेट पाकळ्या घडावर ठेवून बाकीच्या पाकळ्या काढून टाकाव्यात. साधारणतः 10-12 पाकळ्या प्रत्येक घडावर ठेवाव्यात व प्रत्येक पाकळीस सरासरी दहा मणी ठेवल्यास 100-120 मण्यांची मर्यादा लक्षात घेऊन थिनिंगची मर्यादा ठरवावी. अशाप्रकारे प्रत्येक घडावर 100-120 मणी राहतील व घड सुटसुटीत/ मोकळा होईल.
तक्ता क्र. 1
जीएचा निर्यातक्षम घडाच्या पाकळ्यांच्या वाढीसाठी व फुलोरा अवस्थेतील वापर
क्र.अवस्थासंजीवक व त्याचे प्रमाणद्रावणाचा सामूकार्य
1)5 पाने अवस्था किंवा पोपटी रंगाचा घडजीए 10 पीपीएम + युरिया फॉस्फेट5-6पाकळ्यांची लांबी वाढविणे
2)पहिल्या अवस्थेनंतर 3-4 दिवसांनीजीए 15 पीपीएम + सायट्रिक किंवा फॉस्फोरिक ऍसिड5-6पाकळ्यांची लांबी वाढविण्यासाठी
3)गरजेनुसार दुसऱ्या अवस्थेनंतर 3-4 दिवसांनीजीए 20 पीपीएम + सायट्रिक किंवा फॉस्फोरिक ऍसिड5-6पाकळ्यांची लांबी वाढविण्यासाठी
4)50% फुलोरा अवस्थाजीए 40 पीपीएम + सायट्रिक किंवा फॉस्फोरिक ऍसिड5-6पाकळ्यांची लांबी वाढविण्यासाठी 
अधिक वाचा

द्राक्ष घडाच्या गुणवत्तावाढीसाठी जीएचा प्रभावी वापर

बिया असणाऱ्या द्राक्षांत मण्यांच्या वाढीसाठी द्राक्ष मण्याची बी संजीवकांचा नैसर्गिक स्रोत असते; परंतु बिनबियांच्या द्राक्षामध्ये बाहेरून संजीवकांचा वापर करणे आवश्‍यक ठरते. यात प्रामुख्याने जीएचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो. स्थानिक बाजारपेठ तसेच निर्यातीसाठीच्या सर्वच द्राक्षांमध्ये ऑक्‍टोबर छाटणीनंतर जीएचा वापर केला जातो.
द्राक्ष बागेत संजीवकांचा योग्य वापर ही आवश्‍यक आणि अत्यंत महत्त्वाची बाब आहे. संजीवकांच्या वापराशिवाय निर्यातक्षम द्राक्ष निर्मिती अशक्‍य आहे. संजीवके ही पाहिजे त्या प्रमाणात आणि योग्य त्या वाढीच्या अवस्थेतच देणे फायद्याचे ठरते. असे न झाल्यास पाहिजे ते परिणाम दिसून येत नाहीत, त्यासाठी संजीवकांचे द्रावण करण्यापासून ते वापरापर्यंत प्रत्येक बाबतीत काटेकोरपणा पाळला पाहिजे; तरच आपल्याला संजीवकांचे उत्कृष्ट परिणाम द्राक्षवेलीवर दिसून येतील.
बिया असणाऱ्या द्राक्षांत मण्यांच्या वाढीसाठी द्राक्ष मण्याची बी संजीवकांचा नैसर्गिक स्रोत असते; परंतु बिनबियांच्या द्राक्षांमध्ये बाहेरून संजीवकांचा वापर करणे आवश्‍यक ठरते. यात प्रामुख्याने जीएचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो. स्थानिक बाजारपेठ तसेच निर्यातीसाठीच्या सर्वच द्राक्षांमध्ये ऑक्‍टोबर छाटणीनंतर जीएचा वापर केला जातो.
संजीवकांचे द्रावण तयार करताना विरघळणारे रसायन वापरले जाते. जीए-3चे द्रावण तयार करताना ऍसिटोनचा वापर केला जातो. त्यासाठी 50 मि.लि. ऍसिटोन प्रति ग्रॅम जीएसाठी सूत्रच झाले आहे; परंतु 25 ते 30 मि.लि. ऍसिटोनमध्ये एक ग्रॅम जीए पूर्णतः विरघळतो, त्यामुळे यापेक्षा जास्त ऍसिटोन वापरणे गरजेचे नाही. जीए या संजीवकाचे फवारणीसाठी द्रावण तयार करताना प्रथम मूळ द्रावण (स्टॉक सोल्यूशन) करता येते. सर्वप्रथम एक ग्रॅम जीए ऍसिटोन सॉलवंटमध्ये विरघळून घ्यावा. त्याचे एकत्रित पाण्यात एक लिटर मूळ द्रावण तयार करावे. अशा पद्धतीने तयार झालेले द्रावण हे 1000 (एक हजार) पीपीएम तीव्रतेचे होईल. यातून पाहिजे त्या पीपीएमचे द्रावण फवारणीसाठी तयार करता येते. जर 10 ग्रॅम जीए एक लिटर पाण्यात (वर नमूद केल्याप्रमाणे) विरघळवल्यास द्रावण हे 10,000 पीपीएम तीव्रतेचे तयार होईल. फवारणीसाठी 10 पीपीएमचे द्रावण करावयाचे असल्यास 500 लिटर पाण्यासाठी 500 मि.लि. मूळ द्रावण घ्यावे लागेल.
खाली दिलेल्या तक्‍त्याचा वापर करून फवारणीसाठीचे द्रावण तयार करता येईल. दहा हजार पीपीएमच्या मूळ द्रावणातून हवे त्या तीव्रतेचे द्रावण तयार करता येईल.
जीए-3चे द्रावण हे सर्वपरिचित आहे. जीए-3चे द्रावण जर ऍसिडिक म्हणजेच जीएच्या द्रावणाचा पीएच (सामू) 6.0 ते 6.5 एवढा असेल, तर त्याचे शोषण जास्त होते. बऱ्याच द्राक्ष बागांतील पाण्याचा सामू हा 7.5 पेक्षा जास्त असतो. अशा वेळी फवारणीच्या द्रावणाचा सामू कमी करणे आवश्‍यक असते. यासाठी सायट्रिक ऍसिड, फॉस्फोरिक ऍसिड किंवा युरिया फॉस्फेट यांचा वापर करावा. सर्वच द्राक्ष बागांत पाण्याचा सामू, विद्युत वाहकता (ईसी), तसेच पाण्यातील विद्राव्य सोडिअमचे प्रमाण सारखे नसल्यामुळे सामू कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रावणात पाहिजे त्या प्रमाणात पाच ते सहा पीएच (सामू) मिळेपर्यंत सामू कमी करणारे रसायन पाण्यात मिसळून द्रावण ढवळून पीएच पेपरच्या साह्याने सामू तपासून पाहावा. शक्‍यतोवर युरिया फॉस्फेटची सलग फवारणी टाळावी, जेणेकरून घडाचा कडकपणा टाळता येईल.
अधिक वाचा

द्राक्ष घड जिरण्याच्या समस्येवर उपाययोजना

द्राक्ष बाग स्वमुळावर असेल तर आठ दिवसांत व खुंटावर असेल तर 10 ते 12 दिवसांत फुटी निघतात. या फुटी निघाल्यानंतर फुटीला साधारणतः एका आठवड्याने तीन ते पाच पाने दिसू लागतात. अशातच काही फुटींसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड निघतात, त्यालाच घड जिरणे असे म्हणतात. काही फुटींसोबत जर घड आधीच जोमात असेल तर घड जिरणार नाही; परंतु बऱ्याच ठिकाणी घडाचा जोम पूर्णतः नसतो, त्यामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते. हे लक्षात घेऊन बागेचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
मागील लेखात आपण ऑक्‍टोबर छाटणीनंतर एकसारख्या फुटी काढण्यासाठी हायड्रोजन सायनाईडच्या वापराबद्दल तसेच द्राक्ष बागेत बोदाचे महत्त्व याबाबत माहिती मिळवली. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे ऑक्‍टोबर छाटणी हे कौशल्याचे काम आहे.ऑक्‍टोबर छाटणी ही प्रत्यक्षपणे उत्पादनाशी निगडित असते. एकसारख्या निघणाऱ्या फुटी व फुटीबरोबर दिसणाऱ्या घडांच्या संख्येवर पुढील हंगामाचे भवितव्य ठरलेले असते.
हायड्रोजन सायनामाईड लावल्यानंतर फुटी आठ ते 12 दिवसांत दिसू लागतात. द्राक्ष बाग स्वमुळावर असेल तर आठ दिवसांत व खुंटावर असेल तर 10 ते 12 दिवसांत फुटी निघतात. या फुटी निघाल्यानंतर फुटीला साधारणतः एका आठवड्याने तीन ते पाच पाने दिसू लागतात. अशातच काही फुटींसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड अथवा बाळी निघतात, त्यालाच घड जिरणे असे म्हणतात. काही फुटींसोबत जर घड आधीच जोमात असेल तर घड जिरणार नाही; परंतु बऱ्याच ठिकाणी घडाचा जोम पूर्णतः नसतो व घड जिरण्याची समस्या उद्‌भवते.
घड जिरण्याच्या समस्येचे मूळ कारण जरी एप्रिल छाटणीतील व्यवस्थापन व त्या वेळीस होणारा वातावरणातील बदल असेल तरी या समस्येस बरीच कारणे आहेत.
घड जिरण्याची कारणे ः
1) उशिरा झालेली खरड छाटणी ः खरड छाटणी उशिरा झालेल्या बागांमध्ये खरड छाटणीनंतर अन्नसाठा तयार होणाऱ्या कालावधीमध्ये सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे ऑक्‍टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या येते.
2) खरड छाटणीनंतर ढगाळ हवामान ः खरड छाटणी मुख्यतः सुप्त अवस्थेतील घडनिर्मिती घडवून आणण्याकरिता केली जाते. सूक्ष्म घडनिर्मितीची प्रक्रिया चालू असताना वातावरणातील घटक अनुकूल नसल्यास पेशी विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम घडनिर्मितीवर होतो किंवा अंशतः घडनिर्मिती होऊन प्रत्यक्षात फूट निघण्याच्या वेळी दिसून येणारा घड हा योग्य प्रकारे तयार होत नाही.
3) फुलोरा निर्मितीतील घटकांमधील बदल ः फळधारक डोळ्यांची निर्मिती तीन अवस्थांमधून होते. ऍनालाजेनची निर्मिती, फळधारक डोळ्यांची निर्मिती आणि फुलांची निर्मिती या तीन अवस्थांपैकी फुलोऱ्यांची निर्मिती ही अवस्था खूप महत्त्वाची असते. या अवस्थेच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये त्यात प्रकाश सायटोकायनिन, आरएनए (रायबोन्युक्‍लिक ऍसिड) बदल झाल्यास त्याचा परिणाम बाळी किंवा शेंडा निर्मितीमध्ये होतो.
4) सूक्ष्म घडांचे पोषण ः काडी तपासणी अहवालामध्ये अनेक वेळा पांढऱ्या घडांची नोंद असते, म्हणजेच सूक्ष्म घडनिर्मितीमधील पहिले दोन टप्पे व्यवस्थित पार पडलेले असतात; परंतु तिसऱ्या टप्प्यात खरड छाटणीनंतर 61 ते 90 दिवसांच्या कालावधीत काही कारणामुळे घडांचे पोषण योग्य प्रकारे होत नाही. त्यातच असे घड फुटीची वाढ होताना पावसाळी हवा असेल तर असे घड फुटींच्या वाढीच्या अवस्थेत जिरण्याची शक्‍यता जास्त असते. स्वच्छ हवामानात असे घड टिकून राहतात; परंतु वाढ फारशी समाधानकारक होत नाही.
5) वेलीतील अन्नसाठा ः खरड छाटणीनंतर काडी पक्वतेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव, पाने गळणे किंवा नवीन फुटींची सतत वाढ या कारणांमुळे वेलींमध्ये पुरेसा अन्नसाठा होत नाही. या अगोदर सूक्ष्म घडनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. त्यामुळे ऑक्‍टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या या परिस्थितीमध्ये यायला नको, तरी फुटींच्या वाढीसोबत घडाचा विकास होणे अडचणीचे ठरते.
6) बोद व पांढऱ्या मुळींची संख्या ः संशोधनाअंती आढळून आले, की बागांमध्ये छाटणीच्या वेळी वेलींच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेली पांढरी मुळे नसल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम घड जिरण्यात होतो. वेलींमध्ये मुळातच अन्नसाठा कमी त्यात मुळी कार्यक्षम नसल्याने तसेच पांढरी मुळे कार्यक्षम न करून घेतल्याने फूट बाहेर पडण्यासाठी आवश्‍यक जोम मुळांद्वारे मिळत नाही, त्यामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते.
7) ऑक्‍टोबर छाटणीतील चुका ः ऑक्‍टोबर छाटणी करताना झालेल्या चुकांमुळे वेलीवर कमी घड लागतात. योग्य ठिकाणी छाटणी न झाल्यामुळे घड जिरण्याची शक्‍यता कमी होते. हायड्रोजन सायनामाईडची पेस्टिंग करताना जास्त डोळ्यांना पेस्टिंग केली गेल्यामुळे जास्त डोळे फोडून निघतात. वेलीमध्ये अन्नसाठ्याचा अभाव असताना जास्त डोळे फुटल्यास फुटीचा जोम कमी राहतो. अन्नसाठ्याची विभागणी होते व घड जिरणे किंवा लहान येणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात.
ऑक्‍टोबर छाटणीनंतरच्या उपाययोजना ः
बागेच्या व्यवस्थापनात झालेल्या काही चुका तसेच काही घटकांचा ऑक्‍टोबर छाटणीशी असणारा प्रत्यक्ष संबंध याचा विचार करता या समस्येवर ऑक्‍टोबर छाटणीनंतर कशाप्रकारे मात करता येईल यासाठी काही उपाययोजना करणे आवश्‍यक असते.
1) खरड छाटणी शक्‍यतोवर उशिरा करू नये.
2) द्राक्ष काडीची घडासाठी तपासणी करावी ः ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी द्राक्ष काडीची तपासणी करून काडीवरील डोळ्यांमधील घडांची परिस्थिती समजावून घेणे आवश्‍यक आहे. सुरवातीच्या डोळ्यांमध्ये घडनिर्मिती चांगली झालेली असते तेव्हा परिस्थिती लक्षात घेऊन छाटणी केल्यास चांगली घडनिर्मिती झालेले डोळे उपयोगात येऊ शकतात.
3) ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी ताण देणे ः छाटणीअगोदर ताण दिल्यास पानांमधील अन्नसाठा द्राक्ष काडीकडे व डोळ्यांकडे वळविला जाऊन त्याचा फायदा नवीन फुटीस होईल व एकसारखी फूट निघण्यास मदत होईल.
4) योग्य छाटणी व एकसारखी फूट ः योग्य छाटणी व नियंत्रित डोळ्यांमधून एकसारखी फूट काढणे यास देखील महत्त्व आहे. काडीवरील जितके जास्त डोळे फुटून येतील तेवढा अन्नसाठ्याचा व्यय जास्त होईल. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घड जिरण्याची समस्या उद्‌भवू शकते. म्हणूनच नेमके डोळे फुटून येण्यासाठी छाटणी व पेस्टिंगद्वारे उपाययोजना करावी. हायड्रोजन सायनामाईडचे प्रमाण योग्य वापरून पेस्टिंग करताना नेमकेच डोळे फोडून काढावेत व नंतर साधारणतः एका काडीवर एक घडाची फूट व विस्ताराच्या दृष्टीने काही वांझ फुटी राखाव्यात.
घड जिरण्याची समस्या दिसत असल्यास वाढ विरोधकांचा वापर करावा. सध्या सीसीसी सारख्या वाढविरोधकास मनाई नसली तरी त्यावरील प्रयोग सुरू असल्यामुळे ते वापरणे इष्ट होणार नाही म्हणून दुसरे वाढविरोधके वापरू नयेत. वेलीच्या वाढीचा वेग हा पाणी तसेच नत्र यांच्या नियंत्रणाने कमी करावा. या वेळी वेलीच्या वाढीचा वेग मंदावणे गरजेचे असते. त्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा योग्य वापर करावा. त्यामध्ये जास्त रसायनाचा वापर टाळावा व जोपर्यंत घड व्यवस्थित होत नाही तोपर्यंत नत्र तसेच जीएचा वापर करू नये. या दरम्यान सी. विड एक्‍सट्रॅक्‍ट किंवा तत्सम रसायनांचा वापर टाळावा. घडात सुधारणा दिसू लागल्यानंतर जीएच्या फवारणीस सुरवात करावी.
5) जमिनीचे व्यवस्थापन ः पांढऱ्या मुळींची संख्या बरेच प्रमाणात घड जिरण्याच्या समस्येसाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी जमिनीचे व्यवस्थापन करायला हवे. जमिनीच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी बोद हलकेसे हलवून मोकळे करावेत. तसेच पांढऱ्या मुळीच्या वाढीस पोषक वातावरण तयार करणे आवश्‍यक असते.
या वर्षीच्या सध्या परिस्थितीमध्ये घड जिरण्याची समस्या जास्त प्रमाणात उद्‌भवणार नाही; परंतु अनियमित पावसामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवू शकते. एप्रिल छाटणी उशिरा झालेल्या द्राक्ष बागांमध्ये ही समस्या उद्‌भवू शकते. त्यामुळे त्यांना वरील काही उपाययोजना फायदेशीर ठरतील. शेवटी प्रत्येक बागेतील परिस्थिती वेगवेगळी असेल व अशाप्रकारे एकसुरी विश्‍लेषण फायद्याचे ठरणार नाही. तेव्हा समस्येचे मूळ शोधण्याकरिता बागेत केल्या जाणाऱ्या कामाची नोंद ठेवून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचा सल्ला घ्यावा.
अधिक वाचा

...असे ठेवा द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या अवस्थेतील कामे सुरू आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता, बागेत पावसाळी वातावरण नाही. त्यामुळे रोगाच्या समस्या कमी असतील. परंतु इतर काही कामे करत असताना बागेत काय काळजी घेतली पाहिजे, याबद्दलची माहिती आजच्या लेखात घेत आहोत.
खुंटावर कलम केलेल्या बागेत डोळे फुटून निघाले असतील. काही ठिकाणी डोळे उमलण्यास अडचण येत असावी. ज्या बागेत कलम केले आहे, अशा बागेत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गवत काढून बाग स्वच्छ ठेवावी. कारण पाऊस झाला असेल अशा ठिकाणी जमिनीत जास्त आर्द्रता अनुभवास येईल. याचसोबत गवत जास्त असल्यास कलम जोडाजवळ पुन्हा जास्त आर्द्रता वाढेल. कलम जोड व जमीन यामधील अंतर फार कमी असल्यामुळे डाऊनीचा त्रास जास्त वाढू शकतो. कलम जोडावर रोग आल्यास ती कलम पूर्णत: वाया जाऊ शकते. कारण कलम जोडाच्या अवतीभवती गवत असल्यामुळे फवारणी व्यवस्थित करता येत नाही.
फळछाटणी झालेली बाग :
ज्या बागेत नुकतीच फळछाटणी झाली आहे, अशा बागेत आता डोळे फुटून घड बाहेर येण्याची स्थिती असावी. पाऊस संपून जवळपास एक आठवडा झाला, त्यामुळे या वेळी घड जिरण्याची समस्या कमी असेल. वातावरणात जास्त तापमान व आर्द्रता असेल, अशावेळी फूटसुद्धा जास्त जोमात दिसेल. अशा वातावरणात कमीत कमी हायड्रोजन सायनामाईडचा वापरसुद्धा चालेल; परंतु एकसारखी फूट निघावी या दृष्टीने जाड काडी पुन्हा एकदा पेस्ट करावी किंवा पहिल्यांदा पेस्टिंग करतेवेळी जाड काडी मोडून किंवा पिळून घ्यावी. यामुळे एकसारखी फूट बाहेर येण्यास मदत होईल. या बागेत वाढीकरिता पोषक वातावरण असल्यामुळे वाढ जास्त होईल. म्हणजेच फेलफूट लवकर काढून टाकण्याची अवस्था लवकर येईल. फुटीमध्ये अन्नद्रव्य वाया जाणार नाही, याची दक्षता घेऊन वेळीच फेलफूट काढून टाकाव्यात.
रोगनियंत्रण :
फळछाटणी होऊन काही बागेत प्रीब्लूम अवस्थेत घड दिसून येतात. सध्याच्या वातावरणाचा विचार करता द्राक्ष बागेत तापमान जास्त व आर्द्रतासुद्धा जास्त असल्याचा अनुभव येतो. याच बागेत सायंकाळी व सकाळी पानावर दवबिंदू दिसून येतील. अशावेळी पानांवर डाऊनीचा पुन्हा त्रास होण्याची समस्या आढळून येईल, तेव्हा ज्या ठिकाणी कॅनॉपीची गर्दी जास्त आहे, अशा ठिकाणी तळातील पाने काढून टाकल्यास गर्दी कमी करण्यास मदत होईल. त्याचसोबत शिफारशीत फवारणी केल्यास व्यवस्थित कव्हरेज मिळेल. या बागेत शिफारशीप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी घेऊन रोगनियंत्रणात ठेवावा.
कीडनियंत्रण :
जास्त आर्द्रतेमुळे बागेत फुलकिडी प्रादुर्भाव दरवर्षीपेक्षा या वर्षी जास्त असल्याचे आढळून येते. नवीन फुटींवर अजूनही हा त्रास दिसतो. नवीन पाने काढून टाकल्यास पानांवरील फुलकिडी घडावर पोचतील, तेव्हा शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करून वेळीच या फुलकिडीवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा मण्यांवर कीड पोचल्यास समस्या उद्‌भवतील.
थिनिंग :
लवकर छाटणी झालेल्या बागेत सध्या थिनिंगची कामे सुरू आहेत. घड जर सुरवातीसच सुटा झाला असल्यास आता जास्त थिनिंग करायची गरज नसेल; परंतु थिनिंग करतेवेळी सुरवातीच्या वरच्या तीन पाकळ्या तशाच ठेवून त्यानंतर घडाच्या परिस्थितीनुसार एका आड एक किंवा एकाआड दोन पाकळ्या अशा काढून घडातील मण्यांची संख्या ठेवावी. थिनिंग झाल्यानंतर लगेच बागेत शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. यामुळे मण्याला झालेल्या इजेपासून बचाव होईल.
अधिक वाचा

संजीवकांचा वापर

द्राक्ष बागेत अनेक संजीवकाचा वापर केला जातो त्यामध्ये प्रामुख्याने इथ्रेल (इथिलीन),जिब्रेलिक अ‍ॅसिड, लिहोसीन, सिक्स बीए ,ब्रासोनो  (पोषक ) सीपीपीयु यांचा वापर करण्यात येतो.ही संजीवके वापरतांना फारच काळजी घ्यावी लागते त्यांचे प्रमाण कश्या प्रकारे घ्यावे याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे-
१) ईथ्रेल (इथिलीन): ऑक्टोबर छाटणी पूर्वी साधारणता दोन आठवडे या संजीवकाचा वापर पानगळ करण्यासाठी केला जातो.१००० ते २५०० पीपीएम तीव्रतेचे द्रावण फवारले असता छाटणी पर्यत पाने ९० % पर्यत पानगळ होते.तसेच छाटणी योग्य डोळावर करणे सोपे जाते.तसेच छाटणीनंतर डोळे लवकर फुटण्यास मदत होते.
प्रमाण - ईथ्रेल  १२५ मिली ९९ लिटर पाणी -५०० पीपीएम
              ईथ्रेल  १५० मिली ९९ लिटर पाणी -१००० पीपीएम
             ईथ्रेल  ५०० मिली ९९ लिटर पाणी -२००० पीपीएम
             ईथ्रेल  ६२५ मिली ९९ लिटर पाणी -२५०० पीपीएम
२.जिब्रेलिक अ‍ॅसिड : जिब्रेलिक अ‍ॅसिड हे जीब्रेलीन गटातील असून याच्या मुळे पेशी लांबट होतात.घडाच्या पाकळ्या, मण्यांचे  देठ आणि मणी आकार लांबट करण्यासाठी जिब्रेलिक अ‍ॅसिड उपयोग होतो.ऑक्टोबर छाटणीनंतर घड कोवळा असतांना हे संजीवक घडावर वापरावे.घड पोपटी हिरवा असतांना १० पी.पी.एम द्रावणाची फवारणी करावी.यामुळे घडाची लांबी वाढून पाकळ्या मोकळ्या होतात
जर आपणास पहिली बुडवणी (डीप) करावयाची नसल्यास पहिल्या फवारणीनंतर दर पाच दिवसांनी पुन्हा १५ ते २० पीपीएम ने फवारणी करावी. यानंतर पुन्हा पाच दिवसांनी २० पीपीएम ने फवारणी करावी.एकूण तीन फवारण्या घ्याव्यात.
जिब्रेलिक अ‍ॅसिड द्रावण तयार करण्यासाठी प्रमाण:
एक ग्रॅम जीए + ३० मिली अ‍ॅसिटोनमध्ये विरघळून घ्यावे.त्यात क्षारविरहित स्वछ पाणी मिसळुन एक लिटर द्रावण करावे. यास मुळ द्रावण (स्टॉक सोलुशन) असे म्हणतात.
वेगवेगळ्या तीव्रतेचे द्रावण तयार करण्यासाठी :-
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- ९९ लिटर पाणी - १० पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- ४९ लिटर पाणी - २० पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- ३९ लिटर पाणी - २५ पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- २४ लिटर पाणी - ४० पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- १९ लिटर पाणी - ५० पी पी एम
जिबरेलीक अ‍ॅसिड वापरण्यासाठी घडाची अवस्था आणि संजीवकाची तीव्रता याचा मेळ घालणे महत्त्वाचे असते.
३. क्लोरमॅक्कॉट (लिहोसीन):
क्लोरमॅक्कॉट,सायकोसील,सीसीसी,मेपीकॉट क्लोराईड, आणि  लोहोसीन इत्यादि नावाने हे संजीवक ओळखले जाते.हे संजीवक वाढ निरोधक म्हणून काम करते.ऐनवेळी पाऊस पडला तर कोवळी फुट जोमाने वाढते. अशा वेळी घडापुढील शेंडा लवकर वाढतो. त्यामुळे घडांचा जोम मंदावतो या वेळी शेंड्याचा जोम थांबविण्यासाठी वाढ विरोधक संजीवकाचा वापर आवश्यक असतो. पावसाप्रमाणे काही बाबीमुळे सुद्धा शेंडा वाढीस चालना मिळते अशा वेळी हे संजीवक वापरूनसंभाव्य नुकसान टाळावे. ऑक्टोबर छाटणीनंतर घड आणि घडांची फुट वाढीचा काळात फुटीचा शेंडा जोमाने वाढतो वेलीत वाढलेल्या अन्नरसात वाढ चालू असते. फुटीच्या पाचव्या सहाव्या डोळ्यातून घड बाहेर येतो खोडाकडील अन्न रसाचा ओध शेंडा वाढीकडे असल्याने घडाचे पोषण मंदावते. याचा परिणाम घडांचा दर्जा खालवण्यात होतो. शेंडा वाढ थांबवून अन्नरसाचा ओघ घडाकडे वळवल्यास घडांचा दर्जा सुधारतो आणि हेच काम संजीवके करतात
द्राक्षासाठी लिहोसीन वापरण्याची अवस्था :
ऑक्टोबर छाटणीनंतर नवीन फुटीचा ५,६ व्या डोळ्यातील.घड कोवळा असतांना म्हणजे त्यांचा रंग पिवळट
अगर पोपटी असतांना हे संजीवक वापरावे. वेलीवर सर्वच घडाची आणि फुटीची अवस्था एक सारखी नसते. लिहोसीनचा वापर करताच सर्वच शेंड्यांचा जोम मंदावतो आणि तो घडाकडे वळतो. पानांची कर्बग्रहण शक्ती वाढते.शेंड्याकडील अन्नरसाचा ओघ थांबल्यामुळे आणि नवीन पानांची कर्बग्रहणशक्ती वाढल्यामुळे असा दुहेरी अन्नरस घडांना मिळाल्यामुळे घडाचा पोत सुधारतो.सर्व घडांची अवस्था समान पातळीवर येते आणि परिणामी जीब्रालिक असिडचा वापर सुलभ रित्या करता येतो.
द्रावणाची तीव्रता :    
योग्य वेळी वापर केल्यास २५० पीपीएम तीव्रतेचे द्रावण योग्य ठरते.पाहिजे असणा-या अवस्थेपूर्वी एक दिवस अगोदर कमी तीव्रतेचे म्हणजे पीपीएम द्रावण आणि दोन दिवस आगोदर १२५ पीपीएम चे द्रावण वापरावे.या उलट उशीर झाला तर ३७५ किंवा ४५० पीपीएम तीव्रता वापरावी. परंतु ५०० पीपीएम पेक्षा जास्त तीव्रतेचे संजीवक वापरने नुकसानीचे ठरते.सध्या बाजारात लिहोसीन हे संजीवक उपलब्ध आहे.त्याची तीव्रता ५०% असून ते द्रवरूपात उपलब्ध होते.ते पाण्यात मिसळते.
१०० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -१००० पीपीएम 
५० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -५०० पीपीएम
२५ मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -२५० पीपीएम
२० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -१२५ पीपीएम
४० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -२०० पीपीएम
६० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी- ३०० पीपीएम
७५ मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -३७५ पीपीएम
९० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -४५०पीपीएम
लिहोसीन  वापरतांना घ्यावयाची काळजी :
हे संजीवक वापरतांना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.संजीवक फवारतांना शेड्याकडील भागावर एकसारखी फवारणी करावी.फुटीवर ६ ते ७ पाने असतांना तसेच घडापुढे ५-६ पाने असतांना हे संजीवक अधिक परिणामकारक ठरते.
४) सिक्स -बी ए :
   हे संजीवक कायनेटिक या गटात मोडते.पेशीचे विभाजन करण्याच्या गुणधर्मामुळे द्राक्ष भरदार होतात. पानात अधिककर्ब ग्रहण होते.त्यामुळे फळाचे वजन आणि गोडी वाढण्यास मदत होते.फलधारणा पूर्ण झाल्यावर लगेच हे संजीवक १० ते १५ या तीव्रतेने पीपीएम फवारावे.जीब्रालिकच्या फवारण्या झाल्यानंतर गडलिंग करण्यास उशीर होत असल्यास हे संजीवक वापरावे.  
सिक्स बीए च्या जास्तीत जास्त दोन फवारण्या आणि एकूण २० पीपीएम पेक्षा कमी प्रमाणात वापर करावा.सिक्स बीए संजीवक आयसोप्रोपाईल अल्कोहोल मध्ये विरघळून घ्यावे.
५.एनएए: नॅपथेलिक अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड : य़ा संजीवकाचा द्राक्षात वापर काही विशिष्ट कारणासाठी केला जातो.मोहरगळ अथवा लहान फळ गळ थांबवण्यासाठी या संजीवकाचा उपयोग होतो.घड फुलो-यातून बाहेर पडल्यापासून तर मणी ज्वारीच्या आकाराचे होईपर्यंतच्या काळात होणारी गळ थांबवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.यासाठी सुरुवातीस २० पीपीएम तिव्रतेचे द्रावण वापरावे.फलधारनेनंतर एनएए संजीवक वापरले असता फळावरील लव (नॅचरल ब्लूम ) चांगली येते.काढणीपूर्वी मणीगळ कमी होते.तसेच एक आठवडा काढणी लांबवता येते.द्राक्ष काढणीपूर्वी कोणतेही संजीवक २५ दिवस आगोदर वापरू नये.
अधिक वाचा

द्राक्ष गुणवत्तेची त्रिसूत्री :

१.जीब्रेलिक अ‍ॅसिडचा वापर
२. विरळणी
३.गडलिंग
दर्जेदार द्राक्ष म्हणजे एक सारखे लांब असलेले व उत्तम स्वाद रंग व गोडी असलेले मणी,घडामध्ये शक्यतो शॉर्ट बेरीजचे प्रमाण असू नये.मणी एकसारख्या लांबी व फुगवणीचे असावे.दर्जेदार द्राक्ष बनविण्यासाठी अप्रत्यक्षपणे परीणाम करणारे घटक उदा.द्राक्षाची जात,हवामान ,जमिनीचा प्रकार ,मशागत पद्धती ,पाणी देणे पध्दत,रोग व किडींचा बंदोबस्त प्रत्यक्षपणे परिणाम करणारे घटक उदा.घड संख्या कमी करणे,विरळणी करणे ,गडलिंग करणे व संजीवकांचा योग्य वापर करणे हि आहेत.
१.जीब्रेलिक अ‍ॅसिडचा वापर:
१) पहिली बुडवणी (प्रीब्लूम  बुडवणी ) :घड सोनेरी हिरवा पिवळा असतांना म्हणजेच पोपटी असतांना २० ते २५  पीपीएमच्या जीएच्या द्रावणात घडाची बुडवणी करावी.साधारणपणे  थॉमसन सीडलेस २० ते २३  व्या दिवशी स्टेज येते.घडाची पहिली पाकळी मोकळी होणे म्हणजे घडाच्या दांडयापासून अलग झालेली असते.व त्या खालील पाकळ्या कॅप्सुल गोळी आकारात असतात. अशा वेळी वर नमूद केलेल्या स्टेजला बुडवणी करावी.स्टेज आलेली असेल परंतु शेंडा वाढ झालेली नसल्यास किंवा मिळालेला असल्यास घड बुडविणे अवघड होते. व अशा वेळी घडाची व फांद्यांची मोडतोड जास्त प्रमाणात होते. शेंदावाढ मिळालेली नसल्यास घड व फुटीचा शेंडा जिएच्या द्रावणात बुडवून घ्यावा. म्हणजे शेंडा वाढ व घड वाढ होण्यास मदत होईल.ही बुडवणी केल्याने घडाच्या पाकळ्या ३-४-५ दिवसांनी संपूर्ण मोकळ्या होतात व दोन पाकळ्यातील अंतरात लांबी मिळते. प्लेमसीडलेस द्राक्षामध्ये सुरुवातीला स्टेजला घड गोळी सारखा दिसत असलातरी जीए वापरल्यानंतर तो आकाराने मोठा होऊन एक चांगल्या प्रकारचा घड तयार होतो. पहिली बुडवणी झाल्यानंतर पुन्हा ४-५ दिवसांनी १० ते १५ पीपीएम जीएची फवारणी किंवा बुडवणी करावी. बुडवणी करीत असताना घडाला १/२ ते १/३ शेंडा नखलावा म्हणजे घड वीरळणी होऊन पाकळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते. तसेच दोन पाकळ्यातील व पाकळ्यातील कांड्याची लांबी मिळण्यास मदत होते.घडांचा दांडा नखलल्यास जीएमध्ये १ ग्रॅम बेनोमील किंवा १/२ मिली अ‍ॅमिस्टार प्रती लिटर पाण्यातसाठी मिसळावे म्हणजे जखमेमधून रोगराईचा प्रादुर्भाव होणार नाही.जीए फवारणी केली तरी चालेल परंतु फुटीची दाटी असता कामा नये .जीए बरोबर २ ग्रॅम युरिया प्रती लिटर पाण्यासाठी वापरावा  फवारणी एकसारखी व सर्वत्र करावी.
२.दुसरी बुडवणी (कॅपफॉल बुडवणी नंतर  ) :घडाच्या टोप्या उचलल्या नंतर किंवा गळाल्या नंतर  म्हणजेच मणी सेटिंग नंतर सीपीपीयु  बरोबर ४० पीपीएम जीए ची बुडवणी करावी.ही अवस्था साधारणता ४० ते ४५ व्या दिवशी येते.तापमाननुसार व जमिनीच्या प्रकारानुसार हि अवस्था थोडी उशीरा येऊ शकते
३.तिसरी बुडवणी - मणी ज्वारीच्या आकारा एवढे झाल्यानंतर तिसरी बुडवणी ३० ते ४० पीपीएमने करावी. भुरी नियंत्रणासाठी अ‍ॅमिस्टार १/२ मिली प्रतिलीटर ही अवस्था ५५ ते ६० दिवसांत येते.
२.विरळणी (थीनिंग )  : म्हणजे वेलीच्या क्षमतेनुसार,दर्जेदार उत्पादन मिळण्यासाठी काड्या, पाने, घड, पाकळ्या,मणी याची परिस्थीतीनुसार संख्या कमी करणे .विरळणीमुळे मण्यांची फुगवण ,पोषण ,आकर्षकता आणि वजन सुधारते.घडातील मनीकुज कमी होते. व रोग किडीचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होते.सर्व घड एकसारख्या आकाराचे तयार होण्यास मदत होते.निर्यात योग्य उत्पादन घ्यावयाचे असल्यास सर्वांत जास्त महत्व विरळणीलाच आहे.
३.गडलिंग: गडलिंगची अवस्था दुसरी बुडवणी झाल्यानंतर ३/४ दिवसांनी येते.गडलिंग करण्याची स्टेज साधारणपणे छाटणीनंतर ५० ते ६० दिवसांच्या दरम्यान येते. गडलिंग करण्याअगोदर सर्व मांडव -वेली हेलकावून घ्याव्यात.म्हणजेविरळणी होऊन शॉर्टबेरीज होणार नाही. गडलिंग साधारणपणे २ ते २.५ मि.मी.
रुंद आकाराची करावी.म्हणजेच एक रुपया नाणे जाडीची करावी. गडलिंगची जखम २१ ते २८ दिवसात भरून आली पाहिजे.गडलिंगमुळे मुळाकडे जाणारा अन्नसाठा वेलीवरील ऑक्झीन व जीब्रेलिक सारख्या संजीवकाची पातळी वाढते.
               मणी व घड मोठे करण्यासाठी  गडलिंगची  मणी  हे बाजरीच्या आकाराचे असतांना परंतु नैसर्गिक गळ झाल्यानंतर करावी.म्हणजे शॉर्टब्रेरीज होणार नाही.गडलिंग केल्यानंतर वेलीला पाण्याचा ताण पडणार नाही या कडे लक्ष द्यावे.
अधिक वाचा

द्राक्षवेलीसाठी फर्टीगेशनचे नियोजन

गोडी छाटणीसाठी विद्राव्य खतांच्या ग्रेड्स निवडतांना व त्याचे दररोजचे प्रमाण वाढविण्यासाठी द्राक्षवाढीच्या विविध अवस्थांचा विचार करणे आवश्यक आहे.गोडी छाटणीपासून ते द्राक्ष काढणीपर्यंत द्राक्षवेलीच्या वाढीच्या अवस्थेनुसार लागणारी अन्नद्रव्यांची गरज व वापरावयाच्या विद्राव्य खतांच्या ग्रेड्स पुढील प्रमाणे -
छाटणी पासून ते पहिले १५ दिवस  
या अवस्थेत डोळे फुट होत असतांना नत्राचे प्रमाण हे स्फुरद व पालाश यांच्या पेक्षा दुप्पट लागते.म्हणजे एकसारखी डोळे फुट होते.या मध्ये २०:१०:१० +१ मग्नेशीअम +सूक्ष्मअन्नद्रव्ये ही ग्रेड उपयुक्त आहे.
काडीच्या वाढीची अवस्था
या अवस्थेमध्ये घड बाहेर पडत असतात व काडीची वाढ होत असते म्हणून नत्र,स्फुरद,व पालाश यांचे प्रमाण एकसारखे ठेवावे लागते.म्हणून २०:२०:२०: किंवा १९:१९:१९ + मग्नेशीअम +सूक्ष्मअन्नद्रव्ये ही ग्रेड वापरावी 
फुलोरा व फलधारणा
या अवस्थेमध्ये नत्र व पालाशच्या तुलनेत स्फुरदाचे प्रमाण जास्त लागते म्हणून १२:६१:०० ही ग्रेड वापरावी .
फळधारणा ते मणी वाढीची अवस्था 
या अवस्थेमध्ये द्राक्ष वेलींना नत्र,स्फुरद व पालाश १:३:१ या प्रमाणात लागतो म्हणून १३:४०:१३ हि ग्रेड वापरावी.
मण्यात  पाणी फिरण्याची अवस्था
या अवस्थेमध्ये अत्यंत कमी कमी प्रमाणात नत्र व भरपूर पालाश लागतो म्हणून १३:००:४५ ही ग्रेड वापरावी.
फळ पक्वतेची अवस्था
या अवस्थेमध्ये मण्यांमध्ये साखर भरत असते.म्हणून पालाश बरोबर सल्फर असल्यास साखरेचे प्रमाण वाढते व फळ पक्वता लवकर होते.त्यामुळे ००:००:५० +१८% सल्फर ही ग्रेड उपयुक्त ठरते.तसेच मालाची साठवणूक क्षमता वाढते.
 फर्टीगेशन करत असतांना घ्यावयाची काळजी
गेल्या १५ हंगामातील अनुभवांचा विचार करता  फर्टीगेशन तंत्रज्ञान अवलंबताना खालील गोष्टींचा बारकाईने विचार व कृती होणे गरजेचे आहे.
१.शेड्यूलसं मध्ये दिलेली खतांची मात्रा ही सर्व साधारणपणे द्राक्षाला लागणा-या अन्नद्रव्यांची एकूण गरज व चाचणी प्रयोगाचे निष्कर्ष यांच्यावरून ठरवण्यात आलेली आहे.त्यामध्ये माती आणि देठ पृथक्करण अहवालानुसार योग्य वेळी योग्य तो बदल करून घेणे गरजेचे आहे.
फर्टीगेशनचा चांगला फायदा मिळवण्यासाठी छाटणीपूर्वी मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे.हे केल्याने जमिनीचा प्रकार, जमिनीचा पीएच (सामू) , सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता,सेंद्रीय कर्ब ,चुनखडीचे प्रमाण व जमिनीची क्षारता या सर्व गोष्टी कळतात.त्या नुसारच खतांची मात्रा ठरवावी.
३.बदलते हवामान अवेळी पाउस या सर्व गोष्टींचा विचार करून व आपल्या अनुभवानुसार यामध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे.उदा. जर शेंडा वाढ ही अत्यंत जास्त असेल व हवामान अनकूल असेल तर नत्रयुक्त खतांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे.
४.विद्राव्य खतांची मात्रा ही जास्तीत जास्त वेळा विभागणी करून देणे केव्हाही चांगले असते.
५.फर्टीगेशन करत असतांना ठिबक संचाची काळजी घेणे आवश्यक आहे ,प्रत्येक वेलीला समान प्रमाणात खते मिळतीलच ही काळजी घेणे खुपच महत्वाचे आहे.
अधिक वाचा

द्राक्ष बागेत स्लरीचे महत्व

 द्राक्ष बागेत स्लरीचे आतिशय महत्व आहे.स्लरीचा वापर केल्याने द्राक्षवेलीची मुळी सतत चालू राहते त्यामुळे द्राक्ष पिकास अतिशय पोषण होऊन उत्पादनात निश्चित वाढ होते.माझ्या अनुभवा नुसार व माहिती नुसार द्राक्षाची पांढरी मुळी सतत चालू ठेवण्यासाठी खालील प्रमाणे स्लरी अतिशय उपयुक्त आहे.
स्लरी  एकरी २०० लिटर पाण्यासाठी-
२०० लिटर पाणी
४० किलो शेण (४ घमेले )
० ते १५ लिटर गोमुत्र
२ किलो. हरभरा ( भरडलेला)
२ किलो सोयाबीन (भरडलेली )
४ लिटर दही अथवा ताक
२ ते ४ किलो काळा गुळ
२ किलो तांदूळ पेज
 +  बॅक्टेरिया कल्चर 
वरील  सर्व ७ दिवस सावलीत  भिजत ठेवा.पहिल्या तीन दिवस दिवसातून तीन वेळेस उलटे-पालटे हलवा. वरील स्लरीचा एक भाग + १० भाग पाणी घेऊन एकरी मणी सेटिंग नंतर २१ दिवसाच्या अंतराने ३ वेळेस टाका.
सेंद्रीय पदार्थ आणि विघटन करणारे जीवाणू बरोबर सुपिकता म्हणजे जिवाणूंचे संवर्धन केल्यामुळे अन्नद्रव्याची  पिकास उपलब्धता वाढणार आहे.हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे.त्यामध्ये स्फुरद विरघळणारे जीवाणू (पी.एस.बी.),अझोतोबाक्ट्र्र डिक्स हे दर्जेदार उत्पादनासाठी सेंद्रीय पदार्थ पिकास देणे अनिवार्य असून जीवाणू संवर्धनासाठी देखील तितकेच महत्वाचे आहे.पिकावर येणारे बॅक्टेरिया फंगल इन्पशन हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करून जिवंत राहतात व पिकाच्या प्रतिकूल परिस्थीतीत आणि त्यांच्या वाढीस अनकूल असलेल्या हवामानात पिकावर हल्ला चढवितात परंतु जीवाणू खतांच्या वापराने हानिकारक जीवाणु पेक्षा उपयुक्त जीवाणूंची वाढ जोमाने होते.ती जागा मायक्रोऑर्गनायझेशने घेतल्याने इतर रोगकारकांचा उपजीवीकेवर परीणाम होऊन त्यांची संख्या नियंत्रणात येते व उपयुक्त जिवाणूमुळे पिकास मुक्त स्वरुपात हुमिक आम्ल,प्रथिन एन्झाइम्स,ओर्गानिक असिडस इ.मुबलक स्वरुपात उपलब्ध होतात त्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढून पिक सदैव काळोखीवर राहते.
अधिक वाचा
.........................................................