द्राक्षवेलीसाठी फर्टीगेशनचे नियोजन

गोडी छाटणीसाठी विद्राव्य खतांच्या ग्रेड्स निवडतांना व त्याचे दररोजचे प्रमाण वाढविण्यासाठी द्राक्षवाढीच्या विविध अवस्थांचा विचार करणे आवश्यक आहे.गोडी छाटणीपासून ते द्राक्ष काढणीपर्यंत द्राक्षवेलीच्या वाढीच्या अवस्थेनुसार लागणारी अन्नद्रव्यांची गरज व वापरावयाच्या विद्राव्य खतांच्या ग्रेड्स पुढील प्रमाणे -
छाटणी पासून ते पहिले १५ दिवस  
या अवस्थेत डोळे फुट होत असतांना नत्राचे प्रमाण हे स्फुरद व पालाश यांच्या पेक्षा दुप्पट लागते.म्हणजे एकसारखी डोळे फुट होते.या मध्ये २०:१०:१० +१ मग्नेशीअम +सूक्ष्मअन्नद्रव्ये ही ग्रेड उपयुक्त आहे.
काडीच्या वाढीची अवस्था
या अवस्थेमध्ये घड बाहेर पडत असतात व काडीची वाढ होत असते म्हणून नत्र,स्फुरद,व पालाश यांचे प्रमाण एकसारखे ठेवावे लागते.म्हणून २०:२०:२०: किंवा १९:१९:१९ + मग्नेशीअम +सूक्ष्मअन्नद्रव्ये ही ग्रेड वापरावी 
फुलोरा व फलधारणा
या अवस्थेमध्ये नत्र व पालाशच्या तुलनेत स्फुरदाचे प्रमाण जास्त लागते म्हणून १२:६१:०० ही ग्रेड वापरावी .
फळधारणा ते मणी वाढीची अवस्था 
या अवस्थेमध्ये द्राक्ष वेलींना नत्र,स्फुरद व पालाश १:३:१ या प्रमाणात लागतो म्हणून १३:४०:१३ हि ग्रेड वापरावी.
मण्यात  पाणी फिरण्याची अवस्था
या अवस्थेमध्ये अत्यंत कमी कमी प्रमाणात नत्र व भरपूर पालाश लागतो म्हणून १३:००:४५ ही ग्रेड वापरावी.
फळ पक्वतेची अवस्था
या अवस्थेमध्ये मण्यांमध्ये साखर भरत असते.म्हणून पालाश बरोबर सल्फर असल्यास साखरेचे प्रमाण वाढते व फळ पक्वता लवकर होते.त्यामुळे ००:००:५० +१८% सल्फर ही ग्रेड उपयुक्त ठरते.तसेच मालाची साठवणूक क्षमता वाढते.
 फर्टीगेशन करत असतांना घ्यावयाची काळजी
गेल्या १५ हंगामातील अनुभवांचा विचार करता  फर्टीगेशन तंत्रज्ञान अवलंबताना खालील गोष्टींचा बारकाईने विचार व कृती होणे गरजेचे आहे.
१.शेड्यूलसं मध्ये दिलेली खतांची मात्रा ही सर्व साधारणपणे द्राक्षाला लागणा-या अन्नद्रव्यांची एकूण गरज व चाचणी प्रयोगाचे निष्कर्ष यांच्यावरून ठरवण्यात आलेली आहे.त्यामध्ये माती आणि देठ पृथक्करण अहवालानुसार योग्य वेळी योग्य तो बदल करून घेणे गरजेचे आहे.
फर्टीगेशनचा चांगला फायदा मिळवण्यासाठी छाटणीपूर्वी मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे.हे केल्याने जमिनीचा प्रकार, जमिनीचा पीएच (सामू) , सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता,सेंद्रीय कर्ब ,चुनखडीचे प्रमाण व जमिनीची क्षारता या सर्व गोष्टी कळतात.त्या नुसारच खतांची मात्रा ठरवावी.
३.बदलते हवामान अवेळी पाउस या सर्व गोष्टींचा विचार करून व आपल्या अनुभवानुसार यामध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे.उदा. जर शेंडा वाढ ही अत्यंत जास्त असेल व हवामान अनकूल असेल तर नत्रयुक्त खतांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे.
४.विद्राव्य खतांची मात्रा ही जास्तीत जास्त वेळा विभागणी करून देणे केव्हाही चांगले असते.
५.फर्टीगेशन करत असतांना ठिबक संचाची काळजी घेणे आवश्यक आहे ,प्रत्येक वेलीला समान प्रमाणात खते मिळतीलच ही काळजी घेणे खुपच महत्वाचे आहे.
अधिक वाचा

द्राक्ष बागेत स्लरीचे महत्व

 द्राक्ष बागेत स्लरीचे आतिशय महत्व आहे.स्लरीचा वापर केल्याने द्राक्षवेलीची मुळी सतत चालू राहते त्यामुळे द्राक्ष पिकास अतिशय पोषण होऊन उत्पादनात निश्चित वाढ होते.माझ्या अनुभवा नुसार व माहिती नुसार द्राक्षाची पांढरी मुळी सतत चालू ठेवण्यासाठी खालील प्रमाणे स्लरी अतिशय उपयुक्त आहे.
स्लरी  एकरी २०० लिटर पाण्यासाठी-
२०० लिटर पाणी
४० किलो शेण (४ घमेले )
० ते १५ लिटर गोमुत्र
२ किलो. हरभरा ( भरडलेला)
२ किलो सोयाबीन (भरडलेली )
४ लिटर दही अथवा ताक
२ ते ४ किलो काळा गुळ
२ किलो तांदूळ पेज
 +  बॅक्टेरिया कल्चर 
वरील  सर्व ७ दिवस सावलीत  भिजत ठेवा.पहिल्या तीन दिवस दिवसातून तीन वेळेस उलटे-पालटे हलवा. वरील स्लरीचा एक भाग + १० भाग पाणी घेऊन एकरी मणी सेटिंग नंतर २१ दिवसाच्या अंतराने ३ वेळेस टाका.
सेंद्रीय पदार्थ आणि विघटन करणारे जीवाणू बरोबर सुपिकता म्हणजे जिवाणूंचे संवर्धन केल्यामुळे अन्नद्रव्याची  पिकास उपलब्धता वाढणार आहे.हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे.त्यामध्ये स्फुरद विरघळणारे जीवाणू (पी.एस.बी.),अझोतोबाक्ट्र्र डिक्स हे दर्जेदार उत्पादनासाठी सेंद्रीय पदार्थ पिकास देणे अनिवार्य असून जीवाणू संवर्धनासाठी देखील तितकेच महत्वाचे आहे.पिकावर येणारे बॅक्टेरिया फंगल इन्पशन हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करून जिवंत राहतात व पिकाच्या प्रतिकूल परिस्थीतीत आणि त्यांच्या वाढीस अनकूल असलेल्या हवामानात पिकावर हल्ला चढवितात परंतु जीवाणू खतांच्या वापराने हानिकारक जीवाणु पेक्षा उपयुक्त जीवाणूंची वाढ जोमाने होते.ती जागा मायक्रोऑर्गनायझेशने घेतल्याने इतर रोगकारकांचा उपजीवीकेवर परीणाम होऊन त्यांची संख्या नियंत्रणात येते व उपयुक्त जिवाणूमुळे पिकास मुक्त स्वरुपात हुमिक आम्ल,प्रथिन एन्झाइम्स,ओर्गानिक असिडस इ.मुबलक स्वरुपात उपलब्ध होतात त्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढून पिक सदैव काळोखीवर राहते.
अधिक वाचा

द्राक्षफळ द्राक्षाची आवश्यकता

हिवाळा संपण्याची चाहूल लागली, की द्राक्षांचे घोस लक्ष वेधून घेतात. प्राचीन काळापासून ज्ञात असलेल्या या रसदार फळाचा स्वाद मधुर आहेच; पण जीवनसत्त्वे आणि औषधी गुणधर्मांनीही ते परिपूर्ण आहे. कारण द्राक्ष तयार करतांना बागायतदार आपल्या मुलाप्रमाणे त्याला सर्व अन्नद्रव्ये घालत असतात.द्राक्ष हे पाणीदार फळ असल्याने त्याच्या रसात १६ पेक्षा जास्त अन्नद्रव्य असल्याने आपल्या शरीराला मिळतात.द्राक्ष हे प्राचीन फळ मानले जाते. महर्षी वाग्भट द्राक्षाला "फलोत्तमा' असे संबोधतात. द्राक्षाची उपयुक्तता, निवड आणि वापर कसा करावा याची माहिती.
द्राक्षाची लागवड :द्राक्ष पिकाचा कालावधी हा ४ ते ५ महिने झाडावर असते.त्या वरील रोग व किडीच्या बंदोबस्तासाठी द्राक्ष बागायतदार औषधाची फवारणी करतात परंतु फळ पक्व होण्यापूर्वीच फवारणी बंद केली जाते.तेव्हा द्राक्ष तयार झाल्यानंतर त्यामध्ये शक्यतो औषधांचे अंश शिल्लक राहत नाही.आज जवळपास सर्वच द्राक्ष बागायतदार आपली द्राक्ष निर्यात करतात.परंतु निर्यातीसाठी द्राक्ष आकारमान हे १६ ते २० मिमी असावे लागते.म्हणून द्राक्ष वेलीवरील प्रत्येक घड हा निर्यातच होतो असे नाही.जो माल निर्यातक्षम असेल तो निर्यात होतो.व राहिलेला माल हा लोकल बाजारपेठेत जातो.तेव्हा द्राक्ष खाणे हे हानिकारक नाही.हे आता सिद्ध झाले आहे.भारतात मोठ्या प्रमाणात द्राक्षाची लागवड केली जाते. पुणे, सातारा, नाशिक, खानदेश तसेच पंजाबमध्येही द्राक्षलागवड केली जाते. युरोपमध्ये अधिक व्यापक प्रमाणात द्राक्षबागा उभारल्या जातात. द्राक्ष हे उत्तम प्रतीचे फळ आहे. रंगांवरून द्राक्षाचे हिरवी, काळी आणि लालसर काळी असे प्रकार तर बियांसह आणि बियाविरहित असेही प्रकार आढळतात. आयुर्वेदाने सबीज द्राक्षे श्रेष्ठ तर बिया नसलेली द्राक्षे अल्पगुणी मानली आहेत. काळ्या द्राक्षाचा वापर औषधांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. द्राक्षांपासून जॅम, ज्यूस, जेली, वाइन, व्हिनेगर बनवले जाते. द्राक्षे वाळवून मनुका, बेदाणे बनवले जातात. औषधांसाठी द्राक्षाचे बी, फळ, पाने यांचाही वापर होतो.
द्राक्षाची पौष्टिकता:
* द्राक्षात कॅल्शिअम, कॉपर, आयर्न, मॅग्नेशिअम, मॅंगनीज, पोटॅशिअम, सल्फर, सिलिकॉन असे पोषक घटक असतात.
* द्राक्षात जीवनसत्त्व सी आढळते त्यामुळे त्वचारोगावर उपयुक्त.
* जीवनसत्त्व बी 1, बी 2, बी; तसेच फ्लेवोनाइड्‌स आढळतात, जी शरीरास हितकर असतात.
* द्राक्षाचा रंग जेवढा गडद तितकी फ्लेवोनाइड्‌स अधिक असतात.
* त्वरित ऊर्जानिर्मितीसाठी द्राक्षाचा उपयोग होतो.
* द्राक्षबियांतील सॅलिसिलेटमुळे रक्त गोठत नाही, प्लेटलेट्‌स चिकटत नाहीत, त्यामुळे ती ऍस्पिरिनसारखी काम करतात.
* द्राक्षात ग्लुकोज असल्याने तापाने आजारी रुग्णांना द्राक्ष आवर्जून द्यावे; मात्र मधुमेहींनी द्राक्षाचे फार सेवन टाळावे.
* ताजी द्राक्षे योग्य प्रमाणात खाल्ल्यास बद्धकोष्ठतेवर गुणकारी ठरतात.
* डोळ्यांच्या आरोग्यासाठी द्राक्षे उपयुक्त असतात.
* द्राक्षामध्ये आढळणारे फोलेट गर्भवतींसाठी उपयोगी ठरते. या काळात योग्य प्रमाणात द्राक्षांचे सेवन करावे.
* रक्तशुद्धीसाठी द्राक्षाच्या रसाचा (ज्यूस) उपयोग होतो.
* द्राक्षातील फायटोकेमिकल्सचा कर्करोग, हृदयविकाराच्या प्रतिबंधासाठी उपयोग होतो.
* आपल्या शरीरासाठी एका व्यक्तीने कमीत कमी ६ किलो द्राक्ष एका सिझन मध्ये खावी.तेव्हा आपल्या शरीराची झीज उत्तम प्रकारे भरून निघते.
गुणकारी द्राक्ष
* द्राक्षफळ तोंडाला उत्तम रुची आणि स्वाद आणते.
* भूक-तहान शमविण्यासाठीही वापरता येते.
* शरीराचे आणि मनाचेही पोषण त्यातून होते.
* द्राक्षसेवनाने शरीराला व मनाला उत्साह,ऊर्जा, स्फूर्ती मिळते.
* शरीरसंवर्धनासाठी द्राक्ष उपयुक्त ठरते.
* अशक्तपणावरही द्राक्षे गुणकारी ठरतात.
* औषधी गुणधर्मामुळे द्राक्ष हा उत्तम उपचार समजला जातो.
द्राक्षाची निवड आणि वापर
* ताजी, घट्ट द्राक्षे निवडून घ्यावीत. ती सुरकुतलेली नसावीत. पिवळसर द्राक्षे मधुर असतात. शक्‍यतो रंगाने पिवळी द्राक्षे निवडावीत आणि लवकर संपवावीत. साठवण करू नये.
* द्राक्षे प्रथम पाण्यात बुडवून ठेवावीत. हलक्‍या हाताने चोळून स्वच्छ करावीत आणि मग खावीत.
अधिक वाचा
.........................................................