द्राक्ष बागेत स्लरीचे महत्व

 द्राक्ष बागेत स्लरीचे आतिशय महत्व आहे.स्लरीचा वापर केल्याने द्राक्षवेलीची मुळी सतत चालू राहते त्यामुळे द्राक्ष पिकास अतिशय पोषण होऊन उत्पादनात निश्चित वाढ होते.माझ्या अनुभवा नुसार व माहिती नुसार द्राक्षाची पांढरी मुळी सतत चालू ठेवण्यासाठी खालील प्रमाणे स्लरी अतिशय उपयुक्त आहे.
स्लरी  एकरी २०० लिटर पाण्यासाठी-
२०० लिटर पाणी
४० किलो शेण (४ घमेले )
० ते १५ लिटर गोमुत्र
२ किलो. हरभरा ( भरडलेला)
२ किलो सोयाबीन (भरडलेली )
४ लिटर दही अथवा ताक
२ ते ४ किलो काळा गुळ
२ किलो तांदूळ पेज
 +  बॅक्टेरिया कल्चर 
वरील  सर्व ७ दिवस सावलीत  भिजत ठेवा.पहिल्या तीन दिवस दिवसातून तीन वेळेस उलटे-पालटे हलवा. वरील स्लरीचा एक भाग + १० भाग पाणी घेऊन एकरी मणी सेटिंग नंतर २१ दिवसाच्या अंतराने ३ वेळेस टाका.
सेंद्रीय पदार्थ आणि विघटन करणारे जीवाणू बरोबर सुपिकता म्हणजे जिवाणूंचे संवर्धन केल्यामुळे अन्नद्रव्याची  पिकास उपलब्धता वाढणार आहे.हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे.त्यामध्ये स्फुरद विरघळणारे जीवाणू (पी.एस.बी.),अझोतोबाक्ट्र्र डिक्स हे दर्जेदार उत्पादनासाठी सेंद्रीय पदार्थ पिकास देणे अनिवार्य असून जीवाणू संवर्धनासाठी देखील तितकेच महत्वाचे आहे.पिकावर येणारे बॅक्टेरिया फंगल इन्पशन हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करून जिवंत राहतात व पिकाच्या प्रतिकूल परिस्थीतीत आणि त्यांच्या वाढीस अनकूल असलेल्या हवामानात पिकावर हल्ला चढवितात परंतु जीवाणू खतांच्या वापराने हानिकारक जीवाणु पेक्षा उपयुक्त जीवाणूंची वाढ जोमाने होते.ती जागा मायक्रोऑर्गनायझेशने घेतल्याने इतर रोगकारकांचा उपजीवीकेवर परीणाम होऊन त्यांची संख्या नियंत्रणात येते व उपयुक्त जिवाणूमुळे पिकास मुक्त स्वरुपात हुमिक आम्ल,प्रथिन एन्झाइम्स,ओर्गानिक असिडस इ.मुबलक स्वरुपात उपलब्ध होतात त्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढून पिक सदैव काळोखीवर राहते.

0 आपली प्रतिक्रिया » :

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................