छाटणीनंतरचे पाणी व्यवस्थापन

द्राक्ष वेलीवरील माल काढल्यानंतर खरड छाटणीपर्यतच्या कालावधीत ब-याच बागांना पाण्याचा ताण असतो;परंतु या काळात वेलीला नव्या मुळ्या येत असल्याने व वेल खरड छाटणीनंतर वाढणा-या फुटीकरीता या काळात अन्नसाठा करीत असल्याने पाण्याची फारच गरज असते,म्हणून पाण्याचा ताण या काळात देऊ नये.
खरड छाटणीनंतर पुढील २० दिवसांत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास जमिनीच्या प्रकारानुसार मुरमाड ते मध्यम जमिनीतील द्राक्ष बागेस मोकळे पाणी (प्लड पाणी ) द्यावे. त्याचे चांगले परिणाम मिळतात.
पाणी व्यवस्थापन : या काळात वेलीवर फुटी नसतात; मात्र वेलाची फुटण्याची क्रिया चालू राहते. या वेळी ठिबक सिंचनाने मोजके पाणी देणे गरजेचे असते, म्हणजे वरंबा दीड फुट रुंदीत ओला होईल एवढे पाणी द्यावे पाणी देण्याचा कालावधी जमिनीच्या प्रकारानुसार ठरवावा.                                                                                            
  •  मुरमाड ते मध्यम प्रतीच्या जमिनीस एक दिवसाआड पाणी ठीबकने देणे योग्य.
  • खोल काळ्या जमिनीस मात्र दोन दिवसाआड पाणी ठीबकने द्यावे.
२० ते ४० दिवसांतील पाणी  व्यव्स्थापन
       हा फुटीच्या वाढीचा कालावधी असतो. या काळात फुटीचा जोम व पेरांची लांबी बघून पाणीपुरवठ्यात बदल करावा लागतो, तरीही खरड छाटणी ते पुढील २० दिवस जेवढे पाणी दिले जाते, त्यामध्ये २० टक्के वाढ करणे गरजेचे असते.
खरड छाटणीनंतर २० ते ४० दिवसांत रुट्स्टॉकवरील बागेस द्यावयाचे पाणी:
        गेल्या सहा-सात वर्षापासून बेंगरूळू रुट्स्टॉकची लागवड वाढत आहे व रुट्स्टॉक वरील बागेचे ओनरुटच्या तुलनेत ४० ते ५० टक्केच पाणी लागते, असा समज ब-याच द्राक्ष बागायतदारांमध्ये आहे. थोडे जरी पाणी जास्त झाले तरी घड तयार होण्याची प्रक्रिया फार कमी होते असे समजून या काळात भीतीपोटी फारच कमी पाणी दिले जाते. त्याचा परिणाम फुटीची जाडी न वाढणे,  पानांचा आकार छोटा राहणे व पाण्याच्या ताणामुळे वेलीस अन्नसाठा करण्यास अडचणी येतात; परिणामी फळांच्या छाटणीत मालाला वजन कमी मिळणे, दर्जा घसरणे, फुगवण कमी होणे यासारखे प्रकार होतात.
खरड छाटणीनंतर ४० दिवसा नंतर पाणी व्यवस्थापन:
  या कालावधीत फुटीचे शेंडे बंद केल्या नंतर काडी जाड होण्याचा कालावधी असतो व सूक्ष्मघड तयार होण्याचा, घडाचा आकार वाढण्याचा कालावधी असतो. या काळात पाणी जादा देऊ नये; मात्र फार पाण्याचा ताणही पडणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे असते, तापमान कमी झालेले असल्यास वरील टप्या पेक्षा १० ते १५ टक्के प्रमाण कमी करावे; मात्र तापमान कमी झालेले नसल्यास वरील प्रमाणेच पाणी पुरवठा करावा.
द्राक्षवेलीला पाण्याची नेमकी गरज:      

  • द्राक्षावेलीच्या ९० टक्के पाणी व खते घेणा-या मुळ्या वरील ३ ते ८ इंचात असतात त्यानुसार दिले जाणारे पाणी याच भागात पसरेल असे द्यावे, ८ इंचा पेक्षा खाली जाणारे पाणी हे द्राक्ष मुळाच्या दृष्टीने अत्यंत कमी उपयोगी असते.  
  • ठिबक सिंचन आपल्याकडे ज्या देशातून आले, त्या इस्राइलच्या संशोधनानुसार फळपिकांचे पूर्ण क्षमतेने उत्पादन मिळवण्याकरिता एका वेलीला अगर झाडाला वाढण्यास जमिनीच्या पृष्ठभागावरील जेवढे क्षेत्रफळ दिलेले आहे, त्याच्या ३० टक्के भाग रुंदीत ओला झाला, तरच पूर्ण क्षमतेने उत्पादन येते. उदा.: द्राक्ष बागेची लागवड नऊ बाय पाच फुट अंतरावर असल्यास वरंबा तीन फुट रुंदीत ओला झाला पाहिजे. 
  • पाणीवापरात ५० टक्क्याने बचत करण्यासाठी सर्वसामान्य पद्धत म्हणजे क्रियाशील मुळाच्या परिसरात सेंद्रीय आच्छादनाचा वापर. 
  • प्रमाणापेक्षा जादा पाण्याच्या वापरणे फळपिकांच्या मुळ्या कुजण्याचे प्रमाण वाढून पिकांची उत्पादनात ३० टक्क्यापर्यंत घट येते. 
  • प्रमाणापेक्षा जादा पाणीवापराने जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढते, उत्पादकता घटते.          
 

1 आपली प्रतिक्रिया » :

Santosh chavan म्हणाले...

Draksh bagemadhe october chhatanila malachi fugavan ani lambi kami milate, whiteroot kami futatat

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................