द्राक्ष उत्पादकांची निर्यातीकडे पाठ

निर्यात निम्म्याने घटली;उत्पादकाची पसंती स्थानिक बाजाराला,
गेल्या वर्षी युरोपिय देशांनी भारतीय द्राक्ष नाकारल्याचा परिणाम यंदाच्या निर्यातीवर दिसून आला असून,द्राक्षाची निर्यात निम्म्याने घटली आहे.महिनाभरापूर्वी सुरु झालेला द्राक्ष हंगाम आणखी आठवडाभर सुरु राहण्याची शक्यता आहे.आतापर्यत सुमारे १,६०० कंटेनर (अंदाजे २० हजार टन)द्राक्षाची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षी ३ हजार ७०० कंटेनर द्राक्ष निर्यात झाली होती.
युरोपीय देशांकडून द्राक्षाला चांगला दर मिळत असल्याने दशकाभरापासून द्राक्ष निर्यातीत सतत वाढ होत गेली, या वर्षी द्राक्षांवर फवारलेल्या कीड-कीटकनाशकांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याने कारण देऊन गेल्या वर्षी जर्मनीसह युरोपातील काही देशांनी भारतातील द्राक्ष नाकारली होती.त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी व एक्सपोर्टर यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.युरोपातील द्राक्ष निर्यातीबाबत महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत सावध झाले आहेत.
शासकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,या वर्षी युरोपातील नेदरलँडस,बेल्जियम आणि इंग्लंड या देशांमध्ये द्राक्ष निर्यात झाली.जर्मनीमध्ये द्राक्ष पाठवण्यास शेतक-यांची पसंती नव्हती यंदा १५ हजार शेतक-यांनी एकूण १२ ह्जार हेक्टर द्राक्षबागांची नोंदणी द्राक्ष निर्यातीसाठी केली होती, प्रत्यक्षात झालेली निर्यात मात्र मात्र कमी आहे. कारण याला निसर्ग आणि लोकल मार्केट आहे.
द्राक्षनिर्यात करणा-या एक्सपोर्टरांनी दिलेल्या माहिती नुसार, दरवर्षी निर्यात होण्यापूर्वी एकूण किंमतीच्या ४० टक्के रक्कम अदा केली जाते,उर्वरीत रक्कम द्राक्ष विक्रीनंतर खर्च वजा करून चुकते होतात.मात्र या वर्षी परिस्थती वेगळी आहे.मागील वर्षी युरोपात द्राक्ष निर्यात केलेल्या अनेक द्राक्षबागायतदारांना त्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत.त्यामुळे बागायतदारांनी याचा धसका घेतला आहे.द्राक्ष निर्यातीमध्ये नव्याने उतरलेल्या एक्स्पोर्ट कंपन्यानी सुध्दा गेल्या वर्षी निर्यातीसाठीचा आवश्यक दर्जा राखण्यास काही चुका केल्या.त्याचाही फटका या द्राक्ष बागायतदारांना सहन करावा लागला.
युरोपीय बाजारात यंदाच्या प्रतिक्रियेवर लक्ष
साधरणतः १४ एप्रिल पासून पुढे ३० दिवस भारतीय द्राक्ष निर्यातदारांनसाठी महत्वाचे असतात.या कालावधीत युरोपात प्रमुख्याने भारतातूनच द्राक्षे जात असल्याने दर चांगले मिळतात.भारतातून होणा-या एकूण द्राक्षनिर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा जवळपास ९९% असतो.त्यामुळे युरोपातील निर्यात आपल्या दृष्टीने फारच महत्वाची असते.मात्र मागील वर्षीच्या अनुभवामुळे बागायतदार कचरत आहेत.आत्ता पर्यत युरोपात पोहचलेल्या द्राक्षांचे स्वागत तेथे कसे करतात आणि त्या द्राक्षांना किती दर मिळतो,याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.या द्राक्ष उत्पादन कमी असल्याने भारतीय बाजारपेठेत द्राक्षांना चांगली किंमत मिळाली,परंतु एकरी उत्पादनात मात्र घसरण झाल्याचे चित्र दिसते.
नाशिक निर्यातदार संघ
पुणे,सोलापूर,सांगली या भागातील द्राक्ष निर्यात जवळपास संपली आहे.नाशिकमधून अजून काही प्रमाणात निर्यात सुरु आहे.मात्र,विपरीत हवामानामुळे यंदा द्राक्ष उत्पादन घटल्याचे चित्र आहे.द्राक्ष उत्पादन कमी असल्याने स्थनिक बाजारपेठेत चांगले दर ही मिळाले आहे.सरासरी ३० रुपये किलोपेक्षा आधिक दर शेतक-यांना बागेच्या स्तरावर मिळाले आहेत.त्यामुळे निर्यातीचा धोका पत्करण्याचे शेतक-यांनी टाळले.बेदाण्याला यंदा चांगले दर मिळालेल्याने बेदाणे निर्मितीलाही उत्पादकांनी प्रधान्य दिले.
द्राक्ष निर्यात पूर्णतः व्यापा-यांच्या हातात आहे,बोटांवर मोजण्याइतकेच शेतकरी स्वत:द्राक्ष निर्यात करतात.निर्यातीसाठीचे निकष कडक आहेत.शेतक-यांना शासकीय पातळीवरून सर्वतोपरी सहकार्याची गरज असते.त्यात त्रुटी असल्याने शेतक-यांनी धसका घेतला आहे.लातूर सारख्या जिल्हामधून गेल्या वर्षी सव्वादोनशे कंटेनर द्राक्षाची निर्यात झाली होती.या वर्षी ती ५० कंटेनरपर्यत खाली आली.आहे.

0 आपली प्रतिक्रिया » :

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................