प्रश्न तुमचे उत्तर तज्ञांचे

द्राक्ष बागेत काम करतांना अनेक समस्या येतात.या समस्यांसंदर्भात द्राक्ष बागायतदारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची तज्ञांनी दिलेली उत्तरे......


मातीचे आणि देठाचे पृथ:करण नियमीत करणे गरजेचे आहे काय?
-निदान करणे :अशा पध्दतीचे पृथ:करण वेलीमधील अन्नद्रव्यांचा असमतोलपणा, कमतरता व त्यांचे जास्त प्रमाण (विषमता) तपासण्यासाठी केली जाते.असे पृथ:करण केल्यास वेलीतील प्राकृतिक बिघाड कि,जो उत्पादकता कमी करतात,तो समजण्यासाठी मदत होते.कधी कधी वेलीमधील दोन पेक्षा अधिक मुलद्रव्यांची कमतरता आढळल्यास ती ओळखणे अवघड ज़ाते अशा वेळेस देठाचे पृथ:करण करणे जरुरीचे बनते.भुरी सारख्या रोगाचे लक्षण क़ि ज्यात पानांच्या बाहेरील बाजु आतमध्ये वळतात,पालाश कमतरतेशी मिळती जुळती असतात,द्राक्षबागायतदार अशा स्थितीत गोंधळून जातो.वेलीच्या मुळ्य़ांभोवती पाणी साठून राहिल्यास,तेथील हवा खेळती राहत नाही,आणि त्यात जर क्षारतेची भर पडली तर पाने तशीच लक्षणे दाखवतात. अशा पस्थितीत निरोगी वेल व आजारी वेल बाजुला करुन त्यांचे पृथ:करण केले जाते.त्यांचे नमुने एकत्र करण्यासाठी देखील निरोगी व आजारी वेल निवडली जाते.


निरीक्षण : अशा पध्दतीने पृथ:करण हे वेलीमधील अन्नद्रव्याची योग्य रितीने देखरेख करते. जेणे करुन आपणास परिणामी उत्पादन मिळते.यामुळे वेलींना लागणा-या अन्नद्रव्यांची चालु हंगामात गरज आणि अन्नद्रव्यांनवर निष्फळ खर्च कमी करता येतो. आपण सुक्ष्म घड निर्मीतीच्या वेळेस आणि घडांची फुलोरा अवस्थेत देठ पृथ:करण करण्यास शिफारस करतो,यामुळे वेलीमधील घडांचा दर्जा व उत्पादनासाठी लागणा-या अन्नद्रव्यांची निरीक्षणे करावयाची असल्यास, बागेत विशिष्ठ ठिकाण शोधुन प्रत्येक वेळेस त्याच वेलीवरुन नमुने गोळा करावेत.यामुळे अन्नद्रव्यांचे आणि त्यामुळे वेलीच्या उत्पादकतेचे निरीक्षण करणे देखील सोपे जाते.
मातीचे पृथ:करण हे हंग़ाम सुरु होण्य़ापूर्वी आणि खते देण्याआधी करुन घेणे महत्वाचे आहे, यामुळे जमीनीतील सामु,विद्युत वाहकता आणि विशिष्ठ मुलद्रव्यांचे कमी आधिक प्रमाण ओळखता येते,आणि त्याच प्रमाणात त्यांचे व्यवस्थापन करता येते.वेलीवरील संशोधनाद्वारे आपणाला असे निदर्शनास आले आहे की,वेलीतील गरज आणि जमिनीत असलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा यांचा परस्पर संबंध हा एक सारखा नाही.म्हणूनच वेलीमधील अन्नद्रव्यांचे निरीक्षण क़ऱण्यासाठी देठ पृथ:करण करणे जरुरीचे आहे.


कलम यशस्वी होण्याकरिता कोणती परीस्थीती असावी?
- कलम यशस्वी होण्याच्या दृष्टीने बागेतील वातावरणात तापमान ३५ अंश से.पर्यंत व आद्रता ८० टक्क्यांच्यापुढे असणे मह्त्वाचे असते.खुंटकाडी ही पुर्ण परिपक्व झालेली नसुन,रसरशीत असल्यास त्या काडीतुन कलमजोडाच्या मध्यमातुन सायन काडीमध्ये रस पुढे जाईल व कॅलस लवकर तयार होण्यास मदत होईल.या गोष्टीसोबत कलम करणा-या कारागीराची कुशलता तेवढीच महत्वाची आहे.


कलम करण्याकरिता सायनकाडी (डोळ ) ही स्वमुळावरील की खुंटावरील वेलीवरुन घ्यावी?
- कलम करण्याकरीता सायनकाडी ही कोणत्याही प्रकारच्या वेलीवरुन घेतल्यास हरकत नाही.या मध्ये काडीची निवड क़ऱताना महत्वाचा मुद्दा हा आहे, की सायनकाडी परीपक्व झालेली असावी.ही काडी खुंटकाडीला मॅच होइल व मजबुत,फुगीर डोळे असलेली असावी.


रुटस्टॉक बागेतील काडया फारच बारीक असल्यास दोन काड्यांना जोडुन कलम करता येईल का?
-बागेत पुर्णपणे कलम यशस्वी होण्याकरीता काडीची जाडीसुध्दा तेवढीच महत्वाची आहे.बागेत एक दोन ट्क्के अशा दामनाच्या जाडीच्या( दोन-तिन एम एम) काड्यांनवर कलम करता येईल.यामधे फक्त प्रयत्न करता येईल.काही कलम यशस्वी होईल किंवा नाही याची जास्त खात्री नसेल.बागेत पुर्ण काड्या अशाच असल्यास शक्यतो कलम करु नये.


मी किती प्रमाणात खते वेलींना देऊ?
-वरती सांगितल्या प्रमाणे, वेलींना तंतोतंत प्रमाणात अन्नद्रव्ये देणे,हे वेलीच्या देठाचे व मातीचे परिक्षण क़ऱूण ठरवता येईल.वेलींना देण्यात येणा-या पाण्याचा दर्जा देखील काही प्रमाणात अन्नद्रव्ये व्यवस्थापनात मोलाचा वाटा निभावू शकतो,कारण बरीचशी मुलद्रव्ये ही पाण्यात असतात.याच्या पलीकडे कोणत्याही प्रकारची खते आपणाला द्यावयाची आहेत हे ठरवण्यासाठी पाण्याचा व मातीचा दर्जा देखील कारणीभूत ठरतो.


खुंटावर रंगीत जातीचे कलम करणे योग्य आहे का?
-बागेत असलेल्या पाण्याच्या व मातीच्या बिकट परिस्थीतीमुळे स्वमुळावरील बागेच्या उत्पादनात घट येत आहे.खुंट रोपांचा वापर सुरु झाल्यापासुन उत्पादनात वाढ झाली व सोबतच चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळु लागले.तेव्हा ,द्राक्ष जातीचा विचार न करता बागेत असलेल्या अडचणीचा विचार करुन कोणत्या खुंटाचा वापर करता येईल याकडे लक्ष द्यावे.


कलम केल्यानंतर डोळे फुटण्याकरीता किती कालावधी लागतो?
-कलम केल्यानंतर डोळे फुटण्याकरीता बागेतील वातावरण (तापमान व आद्रता) महत्वाचे असते.त्याच सोबत वापरलेली सायन काडी (डोळाची) कशी आहे, त्या काडीवरील डोळा कसा आहे, यावर ब-याच गोष्टी अवलंबुन आसतात.कलम केल्यानंतर काडी फुटायला साधारण बारा ते आठरा दिवसांचा कालावधी लागतो.


जिरणारा घड कसा समजावा?
-तीन-चार पानांच्या अवस्थेत आपल्याला घड बाहेर येतांना दिसतो.अशक्त घडाच्या तळात बाळी दिसेल व घडाचा आकार गोल दिसेल,रंग फिक्कट पिवळसर,असा घड जिरण्याची शक्यता जास्त असते.याच तुलनेत सशक्त अशा घडाचा आकार लाबट असेल व त्याच्या तळात बाळी नसेल.हा जोमदार असा न जिरणाऱा घड असेल.


घड जिरायला लाग़ताच काय करावे?
-फळछाटणी झाल्यानंतर चांगल्या वातावरणात सहा-सात दिवसानंतर डोळे फुटायला सुरुवात होते.बागेत पोंगा अवस्थेत जर वातावरण बिघडले असेल,म्हणजेच पाउस आला असेल,ढगाळी वातावरण असेल किंवा बागेत पाणी साचले असेल,अशा परीस्थीत वेलीमध्ये शरीरशास्रीय हालचालीमध्ये अडथळे येतात.पोंगा अवस्थेतील डोळ्यात सायटोकायीनचे प्रमाण कमी होउन जिबरेलीकचे प्रमाण वाढते,त्यामुळे घड जिरायला लागतो किंवा गोळी घड तयार होतो.अशा परीस्थीत बागेत सीसीसी व ६ बीए यांसारख्या संजिवकांची फवारणी करुन घड जिरण्यापासुन बागेला वाचवता येते.  


फेलफुट क़ाढण्याची योग्य वेळ क़ोणती?
-द्राक्षबागेत तिन ते चार पानांच्या फुटीनिघाल्या की घड दिसायला सुरवात होते.दोन दिवस पुन्हा थांबुन पाच पानांच्या अवस्थेत तो घड (जिरणाऱा क़िवा शसक्त) स्पष्टपणे दिसतो.तेव्हा अशा परीस्थीत फेलफुट काढुन घ्यावी यामुळे काडीतुन वाया जाणारे अन्नद्रव्ये घडाच्या वाढीकरता उपयोगात येईल. ही  फेलफुट काढण्याकरीता उशीर होणार नाही,याची बागायतदारांनी काळजी  घ्य़ावी,कारण या फुटी जेवढ्या कोवळ्या असतात,तेवढय़ाच अन्नद्रव्ये शोषुन घेण्याकरीता सक्षम असतात.     


1 आपली प्रतिक्रिया » :

Unknown म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................